शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

एक थेंबही पुण्याला देणार नाही

By admin | Updated: October 26, 2015 01:50 IST

भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मिटल्याशिवाय एक थेंबही पाणी पुणे महगनगरपालिकेला मिळणार नाही. जलवाहिनेचे मशिनरी फोडून बंद केलेले काम हे केवळ शासनाला जागे करण्यासाठी दिलेली समज होती

पाईट : भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मिटल्याशिवाय एक थेंबही पाणी पुणे महगनगरपालिकेला मिळणार नाही. जलवाहिनेचे मशिनरी फोडून बंद केलेले काम हे केवळ शासनाला जागे करण्यासाठी दिलेली समज होती. आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावयास भाग पाडू नका, असा इशारा आमदार सुरेश गोरे यांनी दिला.भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची पुनर्वसनच्या नियोजनासठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी करंजविहिरे येथे बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, प्रकाश वाडेकर, चासकमान धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष कदम, भामा असखेड कृती समिती अध्यक्ष रोहिदास गडदे, चांगदेव शिवेकर, दत्ता रौंधळ, लक्ष्मण जाधव, महादेव लिंभोरे, सुभाष मांडेकर, दत्ता होले, आशा साकोरे, सुभाष डांगले, संभाजी कोळेकर, किरण मांजरे, सत्यवान नवले, गुलाब शिवेकर, सयाजी कोळेकर, नंदू शिवेकर, रामदास खेंगले, रमेश कोळेकर उपस्थित होते.गोरे म्हणाले, ज्यांना श्रेय घ्यायचे आहे, त्यांनी अवश्य घ्या. मला श्रेय घेण्यासाठी नाही, तर धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी लढा द्यायचा आहे. तर माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव न घेता, ते म्हणाले, या पूर्वीच्या लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांचा विचार न करता धरणातील सर्व पाणीच विकून टाकले आहे. त्यांना आता या विषयावर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही.मागील आमदार व खासदार या लोकप्रतिनिधींनी भामा आसखेड धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याने पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रकल्पातील अवघ्या १४५ शेतकऱ्यांनापाणी देण्यासाठी पाणी शिल्लक नाही, असे कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे यांनी सांगितले.दत्ता होले यांनी एक वर्षापूर्वी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्या वेळी केलेल्या मागण्यांवर ‘जैसे थे’ स्थिती असून त्या वेळच्या १२ मागण्या एक वर्षात पूर्ण होत नसेल, तर अगोदर पुनर्वसना नंतरच जलवाहिनीला सुरुवात ही मागणी कायम आहे, असे गोरे या वेळी म्हणाले. या वेळी प्रकाश वाडेकर, शिवाजी वर्पे, किरण मांजरे, दत्ता रौंधळ, रामदास खेंगले, किरण चोरघे, महादेव लिंभोरे, संभाजी कोळेकर, चांगदेव शिवेकर आदींनी भूमिका मांडली.