शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

पालखी मार्गाच्या कामात वनराई होतेय जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 12:04 IST

इंदापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात लासुर्णे, अंथुर्णे परिसरातील कामास वेग आला आहे. या परिसरातील महाकाय वटवृक्ष सध्या जमीनदोस्त होत आहेत

रविकिरण सासवडे

बारामतीरस्त्यांना देशाची रक्तवाहिनी समजले जाते. ज्या ठिकाणचे रस्ते चकाचक झाले आहेत. तेथे प्रगतीची चाके वेगाने धावली. त्या भागाचा  चौफेर विकास होण्यास मोठा हातभार लागला. मात्र या विकासाला नेहमी पुराण पुरूषाचा बळी द्यावा लागतो. त्याशिवाय विकास पावत नाही, असेच काहिसे चित्र पालखी मार्गावर दिसू लागले आहे. देहू ते पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाला सध्या सुरूवात झाली आहे.

इंदापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात लासुर्णे, अंथुर्णे परिसरातील कामास वेग आला आहे. या परिसरातील महाकाय वटवृक्ष सध्या जमीनदोस्त होत आहेत. शेकडो वर्षांपासून या वटवृक्षांनी या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूवर सावली धरली. या वटवृक्षांच्या सावलीमध्ये अनेकांनी आपले छोटेमोठे व्यावसाय सुरू केले. या व्यावसायांच्या माध्यमातून कष्टकरी लोकांच्या घरात चुल पेटू लागली. त्यामुळे ही झाडे अनेकांच्या सुख-दु:खाचे साक्षीदार झाले. येथील चार पिढ्या या झाडांच्या सावलीतच वाढल्या. आज  या झाडांवर करवतीचे घाव होत असताना अनेकांच्या काळजात चर्र झाले. डोळ्यांच्या कडा पाणवल्या. 

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पालखी सोहळ्यातील चैतन्य कोणालाही अनुभवता आले नाही. देहूमधून संत तुकोबारायांच्या पालखीने प्रस्थान केल्यानंतर पालखी आपल्या गावातून जाणार याचा आनंद पालखीमार्गावरील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. पालखी या परिसरात आल्यानंतर वारीमध्ये पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना देखील या वटवृक्षांचे कोण कौतुक वाटत असे. सणसर ते अगदी इंदापूर पर्यंत हे वटवृक्ष उभे आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाताना वारकऱ्यांना कधी उन्हाचा चटका जानवला नाही.

या वटवृक्षांच्या सावलीमध्ये वारकऱ्यांच्या अनेक पंगती उठल्या. भजन, कीर्तनाला रंग चढला. टाळ-मृदुंगाचा कल्लोळ, राम-कृष्ण-हरीचा घोषही या वटवृक्षांनी शेकडो वर्ष अनुभवला. मात्र विकासाची गंगा आली आणि सर्व  वनराई उजाड करून गेली. ‘माझी इतुकी सेवा मानुनी घ्यावी, ठेवतो देह आता पंढरीनाथा’ अशीच काहीशी भावना या महाकाय वृक्षांची आता असेल. मनुष्यांच्या घरांचे नुकसान झाले म्हणून त्यांना भरपाई मिळाली परंतू एक वटवृक्ष कापल्याने हजारो जीवांचे घर उद्धवस्त झाले त्याची भरपाई आपण कशी करणार आहोत? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो.

वडवर्गिय झाडांचे पुर्नरोपन करा... विकास करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. वडवर्गिय झाडांचे पुर्नरोपन करण्याची गरज आहे. पालखी मार्गाच्या रूंदीकरणाची हद्द जिथे संपते त्यापासून दहाफुट अंतर सोडून वड, पिंपळ, उंबर या झाडांचे पुर्नरोपन केले तर त्या भागातील जैैवविविधता टिकून राहिल.- डॉ. महेश गायकवाडपर्यावरणतज्ज्ञ, बारामती

‘ग्रीन कॉरिडॉर’ची निर्मिती व्हावी ...पुर्नरोपन योग्य झाडांसाठी वन विभागाच्या जागेमध्ये ‘ग्रीन कॉरिडॉर’ उभारण्यात यावेत. जेणेकरून ही झाडे वाचवली जातील. तसेच पालखी महामार्गाच्या कडेने जे नियोजित आराखड्यामध्ये देशी व स्थानिक प्रजातीच्या झाडांना प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून जैैवविविधता जपली जाईल.- श्रीनाथ कवडेवनस्पतीतज्ज्ञ व अध्यक्ष,सोसायटी फॉर एन्व्हार्यमेंट अँडबायोडायवरसीटी काँझरवेशन, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndapurइंदापूरBaramatiबारामतीdehuदेहूPandharpurपंढरपूरAlandiआळंदी