शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

पालखी मार्गाच्या कामात वनराई होतेय जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 12:04 IST

इंदापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात लासुर्णे, अंथुर्णे परिसरातील कामास वेग आला आहे. या परिसरातील महाकाय वटवृक्ष सध्या जमीनदोस्त होत आहेत

रविकिरण सासवडे

बारामतीरस्त्यांना देशाची रक्तवाहिनी समजले जाते. ज्या ठिकाणचे रस्ते चकाचक झाले आहेत. तेथे प्रगतीची चाके वेगाने धावली. त्या भागाचा  चौफेर विकास होण्यास मोठा हातभार लागला. मात्र या विकासाला नेहमी पुराण पुरूषाचा बळी द्यावा लागतो. त्याशिवाय विकास पावत नाही, असेच काहिसे चित्र पालखी मार्गावर दिसू लागले आहे. देहू ते पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाला सध्या सुरूवात झाली आहे.

इंदापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात लासुर्णे, अंथुर्णे परिसरातील कामास वेग आला आहे. या परिसरातील महाकाय वटवृक्ष सध्या जमीनदोस्त होत आहेत. शेकडो वर्षांपासून या वटवृक्षांनी या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूवर सावली धरली. या वटवृक्षांच्या सावलीमध्ये अनेकांनी आपले छोटेमोठे व्यावसाय सुरू केले. या व्यावसायांच्या माध्यमातून कष्टकरी लोकांच्या घरात चुल पेटू लागली. त्यामुळे ही झाडे अनेकांच्या सुख-दु:खाचे साक्षीदार झाले. येथील चार पिढ्या या झाडांच्या सावलीतच वाढल्या. आज  या झाडांवर करवतीचे घाव होत असताना अनेकांच्या काळजात चर्र झाले. डोळ्यांच्या कडा पाणवल्या. 

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पालखी सोहळ्यातील चैतन्य कोणालाही अनुभवता आले नाही. देहूमधून संत तुकोबारायांच्या पालखीने प्रस्थान केल्यानंतर पालखी आपल्या गावातून जाणार याचा आनंद पालखीमार्गावरील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. पालखी या परिसरात आल्यानंतर वारीमध्ये पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना देखील या वटवृक्षांचे कोण कौतुक वाटत असे. सणसर ते अगदी इंदापूर पर्यंत हे वटवृक्ष उभे आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाताना वारकऱ्यांना कधी उन्हाचा चटका जानवला नाही.

या वटवृक्षांच्या सावलीमध्ये वारकऱ्यांच्या अनेक पंगती उठल्या. भजन, कीर्तनाला रंग चढला. टाळ-मृदुंगाचा कल्लोळ, राम-कृष्ण-हरीचा घोषही या वटवृक्षांनी शेकडो वर्ष अनुभवला. मात्र विकासाची गंगा आली आणि सर्व  वनराई उजाड करून गेली. ‘माझी इतुकी सेवा मानुनी घ्यावी, ठेवतो देह आता पंढरीनाथा’ अशीच काहीशी भावना या महाकाय वृक्षांची आता असेल. मनुष्यांच्या घरांचे नुकसान झाले म्हणून त्यांना भरपाई मिळाली परंतू एक वटवृक्ष कापल्याने हजारो जीवांचे घर उद्धवस्त झाले त्याची भरपाई आपण कशी करणार आहोत? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो.

वडवर्गिय झाडांचे पुर्नरोपन करा... विकास करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. वडवर्गिय झाडांचे पुर्नरोपन करण्याची गरज आहे. पालखी मार्गाच्या रूंदीकरणाची हद्द जिथे संपते त्यापासून दहाफुट अंतर सोडून वड, पिंपळ, उंबर या झाडांचे पुर्नरोपन केले तर त्या भागातील जैैवविविधता टिकून राहिल.- डॉ. महेश गायकवाडपर्यावरणतज्ज्ञ, बारामती

‘ग्रीन कॉरिडॉर’ची निर्मिती व्हावी ...पुर्नरोपन योग्य झाडांसाठी वन विभागाच्या जागेमध्ये ‘ग्रीन कॉरिडॉर’ उभारण्यात यावेत. जेणेकरून ही झाडे वाचवली जातील. तसेच पालखी महामार्गाच्या कडेने जे नियोजित आराखड्यामध्ये देशी व स्थानिक प्रजातीच्या झाडांना प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून जैैवविविधता जपली जाईल.- श्रीनाथ कवडेवनस्पतीतज्ज्ञ व अध्यक्ष,सोसायटी फॉर एन्व्हार्यमेंट अँडबायोडायवरसीटी काँझरवेशन, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndapurइंदापूरBaramatiबारामतीdehuदेहूPandharpurपंढरपूरAlandiआळंदी