शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

चासकमानचे पहिले आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST

चासकमान धरणाचा डावा कालवा खेड तालुक्याच्या पुर्व भागातील परिसरातून जातो. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर रेटवडी, खरपुडी, निमगाव, दावडी ...

चासकमान धरणाचा डावा कालवा खेड तालुक्याच्या पुर्व भागातील परिसरातून जातो. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर रेटवडी, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातील शेतकरी अवलंबुन आहे. शेतकऱ्यांनी शेतात कांदा, बटाटा, गहू व तरकारी पिके घेतली आहे. या पिकांना पाण्याची गरज आहे. कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्यामुळे जळून जाण्याच्या मार्गावर आहे. विहिरीची पाणी पातळी खालवली आहे. तसेच भीमा नदीला वाहणारा पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने अजुनही

नदीवरील बंधारे पुर्ण क्षमतेने भरले नाही. कालव्याला पाणी आल्यास पाण्याच्या गळती मुळे ओढ नाल्यांना पाणी येऊन हे पाणी थेट भिमानदी येते. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा वाढतो. धरणाच्या डाव्या कालव्या पाण्याचे पहिले आर्वतन सोडल्यास पिकांना जिवदान मिळून विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिकांना पाणी देता येईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

मध्यतरीच्या काळात अवकाळी पाऊसाचा मोठा फटका पिकांना बसला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्या पावसाच्या फटक्यातुन वाचलेली पिके व त्यानंतर शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांना पाण्याची गरज आहे. धरणाच्या डाव्या कालव्याला तत्काळ पाणी सोडावे अशी मागणी दावडीचे माजी सरपंच संतोष गव्हाणे, संतोष सातपुते,लक्ष्मण दिघे, बाजीराव जाधव, तेजस दिघे, किसन जाधव, संजय गव्हाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

फोटो

०३ दावडी

दावडी परिसरातुन जाणारा डावा कालवा कोरडा ठणठणीत पडला आहे.