शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

राज्य सरकारकडून पात्र उमेदवारांच्या पाठीत खंजीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:14 IST

अमोल अवचिते पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात ...

अमोल अवचिते

पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेण्यात आली. तिसऱ्या निवड यादीच्या उमेदवारांनी नियुक्तीची मागणी केली असता, निवड प्रक्रियेचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून, २०१९ ची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र उमेदवारांना पाठवले आहे. त्यामुळे सरकारने विश्वासघात केला असून, आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची संतापजनक प्रतिक्रिया उमेदवारांनी ‘लोकमत’पुढे व्यक्त केली.

या जुलै २०१९ मध्ये निकाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार पहिली, दुसरी आणि तिसरी अशा स्वरूपात निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तिसरी यादी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अडकली. त्यामुळे लॉकडाऊननंतरच प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगण्यात आले. या परीक्षेची तिसरी निवड यादी जानेवारी ते मार्च २०२० यादरम्यान प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कागद पडताळणी प्रक्रिया सुरू होती. लॉकडाऊनमुळे काही उमेदवारांची कागद पडताळणी होऊ शकली नाही. लॉकडाऊन संपताच पूर्ण करून नियुक्ती दिली जाईल. असे विभागाकडून पात्र उमेदवारांना सांगण्यात आले. मात्र तात्पुरत्या स्वरूपाची विचाराधीन असलेली तिसरी निवड यादी सामान्य प्रशासनाच्या नियमावलीनुसार परीक्षा प्रक्रियेचा एका वर्षाचा कालावधी संपल्याने भरती प्रक्रिया संपुष्टात आली आहे, असे उमेदवारांना पत्राद्वारे सांगण्यात आले.

त्यामुळे ९३२ पैकी सुमारे १३२ हून अधिक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. परीक्षेचा अभ्यास करून पात्र होऊनही कोणतीही चुकी नसताना तसेच सरकारच्या हातात असतानाही मिळाले पद गमवावे लागल्याने उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे, अशी खंत उमेदवारांनी व्यक्त केली.

कोट

“पाच महिन्यांत आम्हाला नियुक्तीपत्र का देण्यात आलीे नाही? सरकार व संबंधित विभागाकडून अत्यंत असंवेदनशीलपणे आम्हाला कोणतीही चूक नसताना प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग येते का?”

-तृप्ती निकम

चौकट

“विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे व आम्हाला टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करू नये. आम्ही सामान्य कुटुंबातील मुले आहोत. एका नोकरीने परिस्थिती बदलते.”

-प्रियांका आंबी.

चौकट

परीक्षा होऊन अडीच वर्ष झाले. सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यकाळ वाढवून घेता येतो. पण या अकार्यक्षम विभागाने हे केलं नाही. हे असच चालू राहील तर विद्यार्थी नक्षलवादाकडे वळायला वेळ लागणार नाही..

- ज्ञानेश्वर मडके

नियुक्ती प्रक्रिया चालू असताना अचानक लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हा शांत राहिलो. पुढील निर्णय शासनाच्या आदेशानुसार तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येतील, असे सांगण्यात आले होते.

-मुकेश घुगे

निवड यादीची कालमर्यादा संपली एवढं सांगून विभागानेच हात झटकले.. यात विद्यार्थ्यांचा काय दोष.. आज पास होऊनही दुसऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून कामाला जावं लागतं.

-सोनाली घनवट