शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून पात्र उमेदवारांच्या पाठीत खंजीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:14 IST

अमोल अवचिते पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात ...

अमोल अवचिते

पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेण्यात आली. तिसऱ्या निवड यादीच्या उमेदवारांनी नियुक्तीची मागणी केली असता, निवड प्रक्रियेचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून, २०१९ ची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र उमेदवारांना पाठवले आहे. त्यामुळे सरकारने विश्वासघात केला असून, आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची संतापजनक प्रतिक्रिया उमेदवारांनी ‘लोकमत’पुढे व्यक्त केली.

या जुलै २०१९ मध्ये निकाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार पहिली, दुसरी आणि तिसरी अशा स्वरूपात निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तिसरी यादी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अडकली. त्यामुळे लॉकडाऊननंतरच प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगण्यात आले. या परीक्षेची तिसरी निवड यादी जानेवारी ते मार्च २०२० यादरम्यान प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कागद पडताळणी प्रक्रिया सुरू होती. लॉकडाऊनमुळे काही उमेदवारांची कागद पडताळणी होऊ शकली नाही. लॉकडाऊन संपताच पूर्ण करून नियुक्ती दिली जाईल. असे विभागाकडून पात्र उमेदवारांना सांगण्यात आले. मात्र तात्पुरत्या स्वरूपाची विचाराधीन असलेली तिसरी निवड यादी सामान्य प्रशासनाच्या नियमावलीनुसार परीक्षा प्रक्रियेचा एका वर्षाचा कालावधी संपल्याने भरती प्रक्रिया संपुष्टात आली आहे, असे उमेदवारांना पत्राद्वारे सांगण्यात आले.

त्यामुळे ९३२ पैकी सुमारे १३२ हून अधिक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. परीक्षेचा अभ्यास करून पात्र होऊनही कोणतीही चुकी नसताना तसेच सरकारच्या हातात असतानाही मिळाले पद गमवावे लागल्याने उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे, अशी खंत उमेदवारांनी व्यक्त केली.

कोट

“पाच महिन्यांत आम्हाला नियुक्तीपत्र का देण्यात आलीे नाही? सरकार व संबंधित विभागाकडून अत्यंत असंवेदनशीलपणे आम्हाला कोणतीही चूक नसताना प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग येते का?”

-तृप्ती निकम

चौकट

“विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे व आम्हाला टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करू नये. आम्ही सामान्य कुटुंबातील मुले आहोत. एका नोकरीने परिस्थिती बदलते.”

-प्रियांका आंबी.

चौकट

परीक्षा होऊन अडीच वर्ष झाले. सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यकाळ वाढवून घेता येतो. पण या अकार्यक्षम विभागाने हे केलं नाही. हे असच चालू राहील तर विद्यार्थी नक्षलवादाकडे वळायला वेळ लागणार नाही..

- ज्ञानेश्वर मडके

नियुक्ती प्रक्रिया चालू असताना अचानक लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हा शांत राहिलो. पुढील निर्णय शासनाच्या आदेशानुसार तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येतील, असे सांगण्यात आले होते.

-मुकेश घुगे

निवड यादीची कालमर्यादा संपली एवढं सांगून विभागानेच हात झटकले.. यात विद्यार्थ्यांचा काय दोष.. आज पास होऊनही दुसऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून कामाला जावं लागतं.

-सोनाली घनवट