शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

राज्य सरकारकडून पात्र उमेदवारांच्या पाठीत खंजीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:14 IST

अमोल अवचिते पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात ...

अमोल अवचिते

पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेण्यात आली. तिसऱ्या निवड यादीच्या उमेदवारांनी नियुक्तीची मागणी केली असता, निवड प्रक्रियेचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून, २०१९ ची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र उमेदवारांना पाठवले आहे. त्यामुळे सरकारने विश्वासघात केला असून, आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची संतापजनक प्रतिक्रिया उमेदवारांनी ‘लोकमत’पुढे व्यक्त केली.

या जुलै २०१९ मध्ये निकाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार पहिली, दुसरी आणि तिसरी अशा स्वरूपात निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तिसरी यादी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अडकली. त्यामुळे लॉकडाऊननंतरच प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगण्यात आले. या परीक्षेची तिसरी निवड यादी जानेवारी ते मार्च २०२० यादरम्यान प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कागद पडताळणी प्रक्रिया सुरू होती. लॉकडाऊनमुळे काही उमेदवारांची कागद पडताळणी होऊ शकली नाही. लॉकडाऊन संपताच पूर्ण करून नियुक्ती दिली जाईल. असे विभागाकडून पात्र उमेदवारांना सांगण्यात आले. मात्र तात्पुरत्या स्वरूपाची विचाराधीन असलेली तिसरी निवड यादी सामान्य प्रशासनाच्या नियमावलीनुसार परीक्षा प्रक्रियेचा एका वर्षाचा कालावधी संपल्याने भरती प्रक्रिया संपुष्टात आली आहे, असे उमेदवारांना पत्राद्वारे सांगण्यात आले.

त्यामुळे ९३२ पैकी सुमारे १३२ हून अधिक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. परीक्षेचा अभ्यास करून पात्र होऊनही कोणतीही चुकी नसताना तसेच सरकारच्या हातात असतानाही मिळाले पद गमवावे लागल्याने उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे, अशी खंत उमेदवारांनी व्यक्त केली.

कोट

“पाच महिन्यांत आम्हाला नियुक्तीपत्र का देण्यात आलीे नाही? सरकार व संबंधित विभागाकडून अत्यंत असंवेदनशीलपणे आम्हाला कोणतीही चूक नसताना प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग येते का?”

-तृप्ती निकम

चौकट

“विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे व आम्हाला टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करू नये. आम्ही सामान्य कुटुंबातील मुले आहोत. एका नोकरीने परिस्थिती बदलते.”

-प्रियांका आंबी.

चौकट

परीक्षा होऊन अडीच वर्ष झाले. सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यकाळ वाढवून घेता येतो. पण या अकार्यक्षम विभागाने हे केलं नाही. हे असच चालू राहील तर विद्यार्थी नक्षलवादाकडे वळायला वेळ लागणार नाही..

- ज्ञानेश्वर मडके

नियुक्ती प्रक्रिया चालू असताना अचानक लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हा शांत राहिलो. पुढील निर्णय शासनाच्या आदेशानुसार तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येतील, असे सांगण्यात आले होते.

-मुकेश घुगे

निवड यादीची कालमर्यादा संपली एवढं सांगून विभागानेच हात झटकले.. यात विद्यार्थ्यांचा काय दोष.. आज पास होऊनही दुसऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून कामाला जावं लागतं.

-सोनाली घनवट