शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या प्रेमासाठी वडील झाले लग्नखर्च द्यायला तयार

By admin | Updated: April 12, 2015 00:34 IST

तिचा अन् त्याचा संसार १६ वर्षांपूर्वीच तुटला होता. दोन मुली पदरात होत्या. न्यायालयाने तिला व तिच्या दोन चिमुरडींसाठी पतीकडून पोटगी देण्यास सुरुवात केली...

पुणे : तिचा अन् त्याचा संसार १६ वर्षांपूर्वीच तुटला होता. दोन मुली पदरात होत्या. न्यायालयाने तिला व तिच्या दोन चिमुरडींसाठी पतीकडून पोटगी देण्यास सुरुवात केली... तिने कर्ज काढून मुलीचे लग्न लावले खरे... मात्र कर्जाचा डोंगर पेलणे अशक्य असल्याचे पाहून मुलीच्या लग्नाचा खर्च मिळावा म्हणून त्याच्याकडूनही लग्नाचा खर्च मिळावा म्हणून तिने न्यायालयात दावा दाखल केला... आपल्या दोघांमधील भांडण बाजूला राहू दे, मुलीच्या प्रेमाखातर तिच्या लग्नाचा खर्च देण्याची पित्याने तयारी दाखवली... त्याने लग्नखर्च म्हणून सव्वादोन लाख रुपये दिले. इतकेच नव्हे तर तिच्या डोहाळजेवणाच्या खर्चासाठीही तो स्वखुशीने राजी झाला.अक्षय आणि सुनीता (नावे बदललेली) हे दोघे १६ वर्षांपासून विभक्त राहात आहेत. त्यांना दोन मुली असून, त्या सुनीताकडे असतात. सुनीताचा उदरनिर्वाहाचा अन्य काही मार्ग नाही. ती तिच्या माहेरी आपल्या मुलींसह राहता होती. त्यामुळे न्यायालयाकडून तिला पोटगी मिळत असे व त्यावर त्या तिघींची गुजराण होत असे. मात्र दरम्यानच्या काळात मोठ्या मुलीचे लग्न झाले. या लग्नासाठी सुनीताने कर्जपाणी घेतले होते. दुसऱ्या मुलीचे शिक्षण सुरू आहे. तिचे शिक्षण आणि हे कर्ज भागविणे तिला अवघड होऊ लागल्याने मुलीच्या लग्नाचा खर्च पतीकडून मिळावा म्हणून सुनीताने कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा खटला चालण्यास व खर्च मिळण्यास तिला कित्येक वर्षे गेले असते; मात्र हा खटला राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आला. माजी न्यायाधीश वि. वि. शहापूरकर, समुपदेशक राजेंद्र ततार, अ‍ॅड. हेमा सुपेकर यांच्या पॅनेलपुढे हा खटला ठेवण्यात आला. त्यांच्या समुपदेशनाने अक्षयने तातडीने मुलीच्या लग्नाचा खर्च देण्याची तयारी केली. २ लाख २५ हजार रुपये ५ हप्त्यांमध्ये देण्यास तो तयार झाला. लग्नाच्या खर्चाबरोबरच मुलीच्या डोहाळजेवणाचा खर्चही करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. तसेच दुसऱ्या मुलीच्या शिक्षणाचीही जबाबदारी त्याने घेतली. (प्रतिनिधी)४पती-पत्नीच्या भांडणामध्ये मुलांवर परिणाम होतो. मुलींच्या बाबतीत तर अनेकदा पक्षपात होतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. मात्र या खटल्यात पित्याने स्वत:हून मुलींची जबाबदारी घेत असल्याचे सांगून रक्कम देण्याची तयारी दर्शविली. लोकअदालतमध्ये दोन्ही पक्षकार समोरासमोर असल्यामुळे व त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणल्यामुळे वाद मिटविण्यास मदत होते, असे समुपदेशक राजेंद्र ततार यांनी सांगितले.