शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अडीच हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:41 IST

सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागात केळीची झाडे उन्मळून पडली असून तूर, गहू, हरभरा पिकालादेखील फटका बसला असून भाजीपाल्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

पुणे : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. राज्यातील जळगाव, धुळे सांगली जिल्ह्याला या तिन्ही जिल्ह्यात सुमारे २ हजार ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी पावसाची नोंद असून या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. या पिकांमध्ये गहू, हरभरा तसेच केळी आणि द्राक्ष या फळ पिकांचादेखील समावेश आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार एक कमी दाबाची द्रोणिका रेषा अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत सक्रिय असून असल्याने उत्तर महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच गारपीटही झाली आहे. विदर्भातील काही ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही भागात गारपीटदेखील झाली आहे.

याचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागात केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. तूर, गहू, हरभरा पिकालादेखील फटका बसला असून भाजीपाल्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी झालेल्या सांगली जळगाव व धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये सहा तालुक्यांमधील २ हजार ६३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात २५० हेक्टरवरील द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावर यावल तालुक्यातील १ हजार १०८ हेक्टरवरील तूर, गहू, मका व केळी या पिकाचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री व शिंदखेडा या तालुक्यातील १ हजार २८१ हेक्टरवरील तूर, गहू, मका व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीRainपाऊसJalgaonजळगावDhuleधुळेSangliसांगलीWheatगहूBananaकेळी