शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

राज्यात अडीच हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:41 IST

सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागात केळीची झाडे उन्मळून पडली असून तूर, गहू, हरभरा पिकालादेखील फटका बसला असून भाजीपाल्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

पुणे : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. राज्यातील जळगाव, धुळे सांगली जिल्ह्याला या तिन्ही जिल्ह्यात सुमारे २ हजार ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी पावसाची नोंद असून या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. या पिकांमध्ये गहू, हरभरा तसेच केळी आणि द्राक्ष या फळ पिकांचादेखील समावेश आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार एक कमी दाबाची द्रोणिका रेषा अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत सक्रिय असून असल्याने उत्तर महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच गारपीटही झाली आहे. विदर्भातील काही ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही भागात गारपीटदेखील झाली आहे.

याचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागात केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. तूर, गहू, हरभरा पिकालादेखील फटका बसला असून भाजीपाल्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी झालेल्या सांगली जळगाव व धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये सहा तालुक्यांमधील २ हजार ६३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात २५० हेक्टरवरील द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावर यावल तालुक्यातील १ हजार १०८ हेक्टरवरील तूर, गहू, मका व केळी या पिकाचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री व शिंदखेडा या तालुक्यातील १ हजार २८१ हेक्टरवरील तूर, गहू, मका व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीRainपाऊसJalgaonजळगावDhuleधुळेSangliसांगलीWheatगहूBananaकेळी