शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

राज्यात अडीच हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:41 IST

सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागात केळीची झाडे उन्मळून पडली असून तूर, गहू, हरभरा पिकालादेखील फटका बसला असून भाजीपाल्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

पुणे : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. राज्यातील जळगाव, धुळे सांगली जिल्ह्याला या तिन्ही जिल्ह्यात सुमारे २ हजार ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी पावसाची नोंद असून या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. या पिकांमध्ये गहू, हरभरा तसेच केळी आणि द्राक्ष या फळ पिकांचादेखील समावेश आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार एक कमी दाबाची द्रोणिका रेषा अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत सक्रिय असून असल्याने उत्तर महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच गारपीटही झाली आहे. विदर्भातील काही ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही भागात गारपीटदेखील झाली आहे.

याचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागात केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. तूर, गहू, हरभरा पिकालादेखील फटका बसला असून भाजीपाल्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी झालेल्या सांगली जळगाव व धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये सहा तालुक्यांमधील २ हजार ६३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात २५० हेक्टरवरील द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावर यावल तालुक्यातील १ हजार १०८ हेक्टरवरील तूर, गहू, मका व केळी या पिकाचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री व शिंदखेडा या तालुक्यातील १ हजार २८१ हेक्टरवरील तूर, गहू, मका व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीRainपाऊसJalgaonजळगावDhuleधुळेSangliसांगलीWheatगहूBananaकेळी