शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

आदर्शांची चिकित्सा व्हायला हवी : डॉ. अरुणा ढेरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 8:51 PM

रामायण, महाभारत या ग्रंथांमधील विचार आत्मसात करून नागरिकांनी समृद्ध होत आनंद निर्माण केला तर एकूणच समाज जीवन अधिक आनंददायी आणि सुदृढ होऊ शकेल...

ठळक मुद्देडॉ. अपर्णा जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ‘प्रश्नांची सोडवणूक कशी करावी, हे सांगणारे शिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. रामायण, महाभारत या ग्रंथांमधील विचार आत्मसात करून नागरिकांनी समृद्ध होत आनंद निर्माण केला तर एकूणच समाज जीवन अधिक आनंददायी आणि सुदृढ होऊ शकेल. आदर्श हे कालानुरूप बदलत असतात. त्याची चिकित्सा ही जरूर केली गेली पाहिजे. परंपरेला प्रश्न विचारण्यासाठी अंगाी धाडस असावे लागते, असे मत साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ लेखिका व संशोधिका डॉ. अपर्णा जोशी यांच्या ‘राष्ट्रीय मूल्य शिक्षणामध्ये महाभारताचे योगदान’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे व प्रकाशक जयंत कुलकर्णी उपस्थित होते. भांडारकर संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘अर्थ म्हणजे केवळ पैसा नव्हे तर जीवनरुपी अर्थ शिकवण्याची गरज आहे. नैतिकता आणि धर्माचा मूळ अर्थ हे सारे आम्ही गमावले आहे. कर्तव्य म्हणजे धर्म असेल तर या धर्माचे आम्ही पालन करतो का, याचा विचार झाला पाहिजे. पाठ्यपुस्तकात आहे त्यापेक्षा मोठा अवकाश विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. त्यातून एखादा विद्याार्थी टिपकागदाप्रमाणे टिपेल. अभ्यास करून नवी मांडणी करेल आणि संशोधन विषय पुढे घेऊन जाईल. आदर्श हे स्वयंभू आणि सार्वकालिक नसते. तर, कालानुरूप बदलत असते. दरवेळी त्या आदर्शांना कालानुरूप तपासून घ्यावे लागते. वाचन, संगीत, चित्र या अदृश्य आनंदातून माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया घडते.’ डॉ. जोशी म्हणाल्या, ‘अव्यभिचारी निष्ठा म्हणजे राष्ट्रभक्ती आहे. रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ आपल्या देशाचे अमूल्य ठेवा आहेत. महाभारतातल्या अनेक कथा या मूल्यशिक्षण देणा-या आहेत. राष्ट्रीय एकात्मता, एकजूट शिकवणारा महान ग्रंथ असे महाभारताबद्दल निश्चित म्हणता येईल. धर्म म्हणजे कर्तव्य हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्राच्या एकात्मते संदर्भात महाभारतातील अनेक कथांचा शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वच नागरिकांनी जरूर बोध घेतला पाहिजे. धर्म म्हणजे कर्तव्य हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सत्य आणि अहिंसा याचा विचार आपल्याला महाभारतातून मिळतो.’कुलकर्णी म्हणाल्या, ‘रामायण रामाची कथा आहे. त्याप्रमाणे महाभारत ही कृष्णाची, अजुर्नाची नाही तर अवघ्या भारताची कथा आहे. महाभारत आपल्याला सत्य, सौहार्द, समन्वय आणि धाडस या चार गोष्टी शिकवते.’

टॅग्स :PuneपुणेAruna Dhereअरुणा ढेरेramayanरामायण