शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : नागरिकांशी साैजन्याने वागण्याच्या पाेलिसांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 20:41 IST

कर्फ्युच्या काळात रस्त्यावरुन फिरणाऱ्या नागरिकांना पाेलिसांनी काठ्यांचा प्रसाद दिल्याने सर्वत्र राेष व्यक्त करण्यात येत हाेता.

पुणे : लॉक डाऊनच्या काळात संचारबंदीमध्ये विनाकारण फिरणार्‍यांना सक्तीने घरी बसविण्यासाठी पोलिसांनी आपल्याकडील लाठीचा जोरदार वापर केला. त्यावर चाहूबाजूने टिका होऊ लागल्याने पोलिसांना सौजन्याने वागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

लॉक डाऊनची घोषणा झाल्यानंतर मंगळवारी व बुधवारी लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत होते. व्हॅनमधून पोलीस लोकांना घरी जाण्याचे आवाहन करत असतानाही लोक त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीवरुन जाणार्‍या तरुणांना काठ्यांचा प्रसाद देण्यास सुरुवात केली.राज्यभरातील ही परिस्थिती पाहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांनी त्यांच्या काठ्यांना तेल लावून ठेवावे असे वक्तव्य केले. त्यामुळे पोलिसांना मोकळे रान मिळाले. राज्यभरात पोलीस दिसेल त्याला झोडपून काढू लागले. काही पोलिसांची मजल त्याही पुढे गेले़ त्यांनी लोकांना आपण कसे मारतो, हे दाखविणार्‍या व्हिडिओ काढून ते टिकटॉकवर टाकण्यास सुरुवात केली. 

पोलीस दुपारी, रात्री गल्लीबोळातून जात असलेल्यांना दंगलखोर असल्याप्रमाणे वागणूक देत मोटारसायकलवरुन येऊन मारहाण करु लागले. नागरिकांचा रोष वाढू लागल्याचे पाहून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यामुळे पोलिसांना सौजन्यांने वागण्याच्या सूचना देण्यात आला. शहरातील रस्त्यांवर आता कोठेही नाकाबंदी न करता चौकातील सीसीटीव्हीच्या कक्षेतच नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. 

नागरिकांना मारहाण होणार नाही, याकडे सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांनी स्वत: गस्त घालून लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून रस्त्यावरील पोलिसांच्या वागणूकीत बदल झाल्याचे दिसून आला आहे. अनेक ठिकाणी पोलीस गाडीवरुन आलेल्यांना हात जोडून विनंती करीत असल्याचे दृश्य दिसू लागले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे