शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचन येथे कोरोनाचा कहर काही थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:11 IST

उरुळी कांचन व परिसरात कोरोनाने कहर माजवला असून या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला नागरिक सहकार्य करीत नाहीत ही एक बाजू ...

उरुळी कांचन व परिसरात कोरोनाने कहर माजवला असून या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला नागरिक सहकार्य करीत नाहीत ही एक बाजू आहेच, पण स्थानिक प्रशासन जसे ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल व पोलीस कठोर कारवाईची भूमिका घेत नसल्याने रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एका दिवसात २१ रुग्ण सापडण्याचा उच्चांक झाला आहे ! तसाच उच्चांक गेल्या ४८ तासात ३५ रुग्ण सापडल्याने झाला आहे. गेल्या ४८ तासात ३५ रुग्ण सापडले आहेत. या वृताला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सुचिता कदम यांनी दुजोरा दिला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचाय़त हद्दीत सुमारे ४५ ॲक्टीव्ह रुग्ण असतानाही, काही नागरिक मास्कविना फिरताना सामाजिक अंतर पाळत नाहीत तर दुकानदार सॅनिटायझरचा वापर करताना दिसत नाहीत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, पोलीस प्रशासनाने कायद्याचा कडक बडगा उगारल्याशिवाय, नागरिक व व्यापारी सुधारणार नाहीत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकार्यांनी केली आहे. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्ययावत आकडेवारीनुसार आजपर्यंत ११७३ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १०९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर आत्तापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला असून ४५ जण ॲक्टीव आहेत.गावातील किराणा व कापडाच्या बाजारपेठा, भाजी मंडई, शासकीय कार्यालये, बँका, पतपेढ्या, वाढदिवस व लग्न समारंभ ठिकाणे येथे कोणत्याही प्रकारची कोरोना प्रतिबंधक उपायांची बंधने पाळताना नागरिक व तेथील कर्मचारी दिसत नाहीत. हे कोरोनाचा प्रसार होण्याचे महत्वाचे कारण दिसत आहे त्यासाठी कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.