शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश काँग्रेस वाचवणार; नाना पटोलेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 7:01 PM

विरोधी पक्षांंना एकत्र करत सोनिया गांधींचा पूढाकार

ठळक मुद्देसंपूर्ण देशच त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे त्रस्तकाँग्रेसच्या काळात शांतता होती तर आता अशांतता

पुणे : भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश वाचवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांंना एकत्र करत आहेत. असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आलेल्या पटोले यांनी पक्षाच्या दिवसभराच्या कार्यक्रमांनंतर पत्रकारांबरोबर काँग्रेस भवनमध्ये संवाद साधला.

पटोले म्हणाले, दिल्लीत शेतकरी अनेक महिने आंदोलन करत आहेत, इंधनाचे दर आकाशाला भिडले, बेरोजगारी वाढत आहे व देशाचे पंतप्रधान यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. संपूर्ण देशच त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे त्रस्त आहे,काँग्रेसच्या काळात शांतता होती, आता अशांतता आहे. 

भाजपा म्हणजे भ्रष्टाचाराचे केंद्र अशी टीका करून पटोले म्हणाले, त्यांच्याच पक्षाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मागील ७ वर्षात स्विस बँकेतील संपत्ती ३०० पट वाढल्याचे म्हटले आहे. पुण्यात प्राईम लोकेशनच्या जागा विकायला काढल्या. यांचा स्थायी समिती अध्यक्ष लाचखोरीत सापडतो. वरपासून खालपर्यंत तिथे हेच सुरू आहे. हे मर्यादा ओलांडणारे लोक आहेत, आता देशातील जनताच त्यांना बरखास्त करेल. पक्षाच्या प्रभारी सोनल पटेल, निरीक्षक बसवराज पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी