शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
2
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
3
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
4
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
5
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
6
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
7
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
8
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
10
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
11
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
12
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
13
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
14
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
15
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
16
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
17
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
18
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
19
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 6:01 AM

मेंदूसह महत्त्वाच्या अवयवांवर सध्याच्या उन्हाळ्याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे!

-डॉ. समीर फुटाणे, न्यूरोसर्जन, नाशिक

रणरणत्या उन्हाळ्याच्या तलखीने सध्या आख्खा देश भाजून निघतो आहे. ‘यावर्षी फारच त्रास होतोय,’ असे आपण दर उन्हाळ्यात म्हणतो; पण यंदा तो दाह सर्वांनाच कितीतरी अधिक प्रमाणात जाणवतो आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उकाडा इतका असह्य  आहे, की कशातच लक्ष लागत नाहीये, अशा तक्रारींत मोठी वाढ झालेली दिसेल.

या वाढत्या उष्म्याचा आपल्या मेंदूवरही मोठा परिणाम होतो आणि येत्या काळात उन्हाळ्याचा पारा असाच चढता राहिला, तर हा प्रश्न  अधिक गंभीर रूप धारण करू शकेल. त्याबाबतची चर्चा सध्या जगभरात सुरू झाली आहे. मेंदू हा आपला छोटा अवयव असला तरीही त्याचे काम सुरळीत चालण्यासाठी मेंदूला सगळ्यांत जास्त रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन लागतो. उन्हामुळे त्वचेच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि घाम येतो. घामाचे बाष्पीभवन होऊन शरीराला थंडावा जाणवावा, यासाठी शरीराने केलेली ही अंतर्गत व्यवस्था आहे; पण त्यामुळे बराचसा रक्तपुरवठा त्वचेकडे जातो आणि मेंदूकडे त्या मानाने कमी! या दरम्यान मेंदूला ऑक्सिजनसुद्धा कमी मिळाल्याने मेंदूचे काम जरा हळू चालते, यालाच ‘कॉग्निटिव्ह डिक्लाईन’ असे म्हणतात.

हवेतला उष्मा वाढतो, तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन (कॉर्टिसॉल)चे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात दिवसाची लांबी वाढल्याने मेलॅटोनीन (झोपेचे संप्रेरक) कमी झालेले असते. याशिवाय सतत उकाड्यामुळे झोप येण्यासाठी लागणारा विसावा दुर्मीळ होतो. यामुळे झोप कमी होऊन चिडचिड वाढते, एकाग्रता कमी होते, थकवा जाणवतो. मानसिक आजाराच्या रुग्णांना तर याचा फारच त्रास होतो.  हवेतील उष्म्यामुळे घाम येऊन शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे स्नायूंचे अतिआकुंचन होऊन पोटरीत पेटके येणे यांसारखे त्रास होतात. पुरेशा प्रमाणात पाणी, लिंबू, मीठ-साखर घेणे हा त्यावरचा एक उपाय आहे.

मेंदूमधला हायपोथॅलॅमस हा भाग शरीरातील तापमापकाचेही काम करतो. तहान लागणे, घाम येणे, लघवीचे प्रमाण, इत्यादी शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवून मेंदू शरीराचे तापमान ३७ अंशांच्या आसपास ठेवतो; पण कधी-कधी अतिउष्णतेने हा तापमापक बिघडतो आणि वयस्कर व्यक्ती, लहान मुले किंवा ज्यांना उन्हात काम करावे लागते अशा व्यक्ती उष्माघाताला बळी पडतात.

शरीराचे तापमान अनियंत्रित झाल्याने, मेंदूच्या पेशीतील कवच काहीसे मेणासारखे वितळते; त्यामुळे मेंदूतील ऊर्जाप्रवाह खंडित होऊन बेशुद्धावस्था येते. शरीराची ऑक्सिजन आणि रक्ताची मागणी वाढल्याने हृदयावर ताण येतो आणि रक्तदाब कमी व्हायला लागतो.  उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते आणि मेंदूच्या अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये गुठळी निर्माण होऊन मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो, त्याला ‘कॉर्टिकल व्हेनस थ्रोम्बोसिस’ असे म्हणतात. कितीतरी कष्टकरी लोक उन्हात काम करताना दिसतात, त्यांतील सगळ्यांना का उष्मघात होत नाही ? - या प्रश्नाचे उत्तर शरीराच्या रचनेत दडलेले आहे. एकदा एका शास्त्रज्ञाने प्रयोग केला. तो आणि त्याचा मित्र, एका बेकरीच्या भट्टीमध्ये गेले आणि हळूहळू त्यांनी तिथले तापमान वाढवण्यास सुरुवात केली.  पारा ३० अंशांवरून चढत-चढत काही तासांमध्ये १०० अंशांपर्यंत नेला; पण खूप घाम आला तेवढाच. त्याखेरीज त्यांना फारसे काही झाले नाही. प्रयोगाच्या दुसऱ्या भागात ते एका १००  अंश सेल्सिअसच्या भट्टीशेजारी अचानक गेले.

या वेळेस होरपळल्यासारखे वाटून त्यांना त्वरित पळावे लागले.  पहिल्या प्रयोगात हळूहळू तापमान वाढल्याने त्यांच्या मेंदूला ‘सेटिंग चेंज’ करायला वेळ मिळाला जो दुसऱ्या वेळी मिळाला नाही. म्हणूनच थंड एसीमधून कडक उन्हात लगेच जाऊ नये किंवा कडक उन्हातून लगेच एसीत प्रवेश करू नये. उन्हाळ्याचा असह्य दाह सहन करत असताना केवळ (ज्यांना परवडेल त्यांनी) एसी किंवा पंख्याचे बटण दाबले म्हणजे तात्पुरता दिलासा मिळेल कदाचित; पण हे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही. मेंदूसह अनेक महत्त्वाच्या अवयवांवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे, हे सगळ्यांनीच ध्यानी घेतलेले बरे!

-डॉ. समीर फुटाणेsfutane@gmail.com

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHeat Strokeउष्माघात