शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

आधी रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करा; नंतरच टोलवसुली ; खेड शिवापूर टोलनाक्यावर शिवसेनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 12:51 IST

 गेले अनेक वर्षे पुणे-सातारा रोडवरील कात्रज बोगदा ते सारोळापर्यंतच्या रस्त्याची अवस्था एकदम दयनीय आहे.

ठळक मुद्देरिलायन्स इन्फ्राला दिले निवेदन .. तर १ जानेवारीपासून या ठिकाणी टोलवसुली करू देणार नाही

खेड शिवापूर/वेळू : पुणे-सातारा रस्त्याची रखडलेली कामे, पुलांची दुरवस्था तसेच वाढलेला टोल या विरोधात भोर व हवेली तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने मंगळवारी पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात आले.  गेले अनेक वर्षे पुणे-सातारा रोडवरील कात्रज बोगदा ते सारोळापर्यंतच्या रस्त्याची अवस्था एकदम दयनीय आहे. अनेक ठिकाणी पुलांची चाललेली संथ कामे, सेवा रस्त्याची दुरवस्था त्यामुळे या भागात प्रवास करणे एकदम जिकिरीचे झाले आहे. असे असतानाही टोलवसुली मात्र जोरात चालू आहे. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी सांगितले.     कोंडे  म्हणाले, की या रस्त्याची कामे वेगात व्हावी यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिली. आंदोलन केली. येत्या महिन्याभरात जर सेवा रस्ते व अपूर्ण पुलांची कामे चालू झाली नाही तर १ जानेवारीपासून या ठिकाणी टोलवसुली करू देणार नाही. आज हे आंदोलन लोकशाही पद्धतीने करतोय. भविष्यात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तसेच दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल. याला सर्वस्वी जबाबदार टोल आणि रोड प्रशासन असेल.  प्रशासन तसेच महामर्गाचा विकास करणारी कंपनी रिलायन्स इन्फ्राचे व्यस्थापक बी. के. सिंग यांनी या वेळी येत्या महिन्याभरात अपूर्ण सेवा रस्ते व पुलांची कामे कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून देण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, भोर तालुका उपसभापती अमोल पांगारे, महामार्ग प्राधिकरणाचे  सुहास चिटणीस, भोर तालुकाप्रमुख माऊली शिंदे, आदित्य बोरगे, युवा नेते लाला रेणुसे, रोहिदास कोंडे, अशोक वाडकर तसेच नागरिक उपस्थित होते.  शिवसेनेतर्फे रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अपूर्ण कामांमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघाताची जबाबदारी रोड प्रशासनाने स्वीकारून अपघातग्रस्तांना आर्थिक मदत करावी. सद्यस्थितीत कात्रज बोगदा ते सारोळा दरम्यानच्या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तर मुख्य रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. स्थानिक नागरिकांची या टोलनाक्याच्या जाचातून सुटका नाही. दररोज या टोलनाक्यावर होणारी स्थानिकांची लूट आता थांबलीच पाहिजे, या उद्देशाने सामान्य नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Puneपुणेtollplazaटोलनाकाroad safetyरस्ते सुरक्षाShiv Senaशिवसेना