शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 21:32 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात तिळाचे उत्पादन सुमारे ६० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिळाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलोमागे ४० ते ५० रुपयांनी दर वधारले आहेत.

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात तिळाचे उत्पादन सुमारे ६० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिळाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलोमागे ४० ते ५० रुपयांनी दर वधारले आहेत. तसेच यंदा राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन कमी झाल्यास तिळाच्या दरामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा ‘तीळा’वरच संक्रात आली असल्याची भावन व्यापा-यांनी व्यक्त केली.      देशात गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत प्रामुख्याने तिळाचे उत्पादन घेतले जाते. देशांतर्गत तिळाची गरज साडेचार लाख मेट्रिक टन इतकी आहे. गेल्या वर्षी देशात तिळाचे उत्पादन ४ लाख ५० हजार मेट्रिक टन इतके होते. यंदा सुमारे १ लाख ७७ हजार मेट्रिक टन उत्पादन झाले असून मे २०१९ मध्ये बाजारात येणारे उन्हाळी तिळाचे उत्पादन साधारण ७० हजार मेट्रिक टन इतके राहण्याचा अंदाज आहे. उत्पादन घटल्याने कच्च्या तिळाच्या दरात किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी तिळाचे भाव किलोस १०० ते ११० रुपयांपर्यंत होते, अशी माहिती मार्केटयार्डातील तिळाचे व्यापारी रमेश पटेल यांनी दिली.

    जगात सुदान, युगांडा, इथोपिया, टांझानिया, नायझेरिया आदी आप्रिष्ठकन देशासह भारत, चीन, पाकिस्तान कोरिया आदी देशांत तिळाचे उत्पादन घेतले जाते. २०१७-१८ मध्ये जगभरात तिळाचे उत्पादन २१ लाख मेट्रिक टन इतके झाले होते. २०१८-१९ मध्ये त्यात वाढ होऊन २४ लाख ७७ हजार मेट्रिक टन इतके झाले आहे. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी भारतात तीळ उत्पादनात झालेली घट समोर आल्यानंतर बाजारात तिळाचे किलोचे दर १७० ते १७५ रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, जगभरातील तीळ उत्पादन वाढीची आकडेवारी जाहीर होताच तिळाच्या दरात घट होऊन ते १४० ते १५० रुपयांवर आले. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत कच्च्या तिळाच्या दरात ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, स्वच्छ तिळाचे दर किलोस १६५ ते १७० पर्यंत आहेत. तिळाचा पुरवठा कमी-जास्त झाला, तरी दरात ५ ते १० रुपयांनी वाढ होईल, असेही पटेल यांनी सांगितले.

    याबाबत अजित बोरा म्हणाले, परदेशातून भारतात तिळाची आयात केली जाते. आयात तिळावर प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. यंदा देशांतर्गत तिळाचे उत्पादन घटले आहे. उन्हाळी तिळाच्या उत्पादनाची परिस्थिती मे महिन्यात समोर येणार असली, तरी दुष्काळामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे देशांतर्गत उपलब्ध तीळ उत्पादनावरच आपली गरज भागवावी लागणार आहे. मात्र, तिळाचे दर वाढल्यास तिळाला मागणी घटून खपावर परिणाम सुरू झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीPuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड