शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पैसे मिळवण्यासाठी सह्या घ्या अन् सभेनंतर भेटा; अनेकांना भाषणापेक्षा सह्यांची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 16:04 IST

सध्याच्या परिस्थितीत राजकीय पक्षांना, नेत्यांना कार्यकर्त्यांची फौज उभे करणे शक्य नसल्याने, आपल्यावरील प्रेम दाखविण्यासाठी अशा विकतच्या प्रेमाचा आधार

निलेश राऊत

पुणे: निवडणूक ती कोणतीही असो मग ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत. या निवडणुकीत प्रचार सभांना गर्दी जमविणे म्हणजे मोठे चॅलेंज. व आलेली लोक शेवटपर्यंत म्हणजे सभा संपेपर्यंत थांबविणे ही मोठी कसोटीच. पण यात स्लिप वरील सह्यांचा सध्या चांगला फंडा दिसून येत आहे.     आजमितीला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. दोन दिवसात जाहीर प्रचार संपेल. मतदानाची तारीख जशी जवळ येऊ लागली तशी प्रचार यंत्रणेने जोर धरला आहे. पक्ष पातळीवर, उमेदवारांकडून मोठ्या प्रचार सभांचे आयोजन केले जाते. राज्यात अनेक ठिकाणी एक दिवसात दहा दहा सभा, बाईक रॅली, पदयात्रा आदींचे आयोजन होते. या सर्व ठिकाणी लोकांची झालेली गर्दी ही त्या उमेदवाराची ताकद दाखवणारी ठरते. याचा इतर मतदारांवर मोठा प्रभाव पडतो असा गोड गैर समज असू ही शकतो. पण खरोखरच या सभांना पदयात्रा, रॅली याला उपस्थित असलेले सर्व जण स्वखुशीने येतात का हा संशोधनाचा विषय आहे.         या प्रचार सभांना झालेल्या गर्दीतील अनेकांना व्यासपीठावरून मोठमोठी भाषणे ठोकणाऱ्यांमध्ये काहीच रस दिसून येत नाही. त्यांना केवळ आपल्याकडील स्लिप वर ( त्या कार्यक्रमाला येण्यासाठी व शेवटपर्यंत होतो/होती, हे दाखविण्यासाठी) एखाद्या प्रमुख कार्यकर्त्यांची किंबहुना यासाठी नियुक्त असल्याची सही कधी मिळते यासाठी धडपड दिसून येते. कारण या स्लिपवर सही मिळाली तरच त्याला नंतर अमुक एक ठिकाणी ठरवून दिलेले पैसे मिळणार असतात. हा प्रकार लपून झाला पाहिजे याची काळजी प्रमुख कार्यकर्ते घेतात. पण ज्याला स्लिप मिळाली आहे व सभा स्थानी हजेरी झाली की घरी जाण्याची घाई आहे. असा उपस्थित ( तो मतदार असेल असे नाही) व्यक्ती आपली ही सहीची व्याकूळता लपवू शकत नाही. त्यामुळेच असे प्रकार इतर सुजान मतदारांच्या लक्षात येतात. व त्या गर्दीचे बिंग फुटते. असो, सध्याच्या परिस्थितीत राजकीय पक्षांना, नेत्यांना कार्यकर्त्यांची फौज उभे करणे शक्य नसल्याने, आपल्यावरील प्रेम दाखविण्यासाठी अशा विकतच्या प्रेमाचा आधार घ्यावा लागत आहे.

आता भेळी चे दिवस गेले,गाडीचे पेट्रोल व रात्रीच्या पार्टीचे काय        आमचा माणूस मग तो कोणत्याही पक्षाचा असो. तो निवडणुकीत उभा राहिला की, त्याचे कार्यकर्ते तन मन धनाने त्याचे मागे उभे राहत. ऊन वारा पाऊस न पाहता केवळ एक वेळच्या सामूहिक भेळीच्या मैफलीत आपला थकवा घालवत. पण काळ बदलला व भेळी च्या मैफली चे ते दिवस सरले अन गाडीचे पेट्रोल व रात्रीच्या पार्टीचे काय असा प्रश्न आहे ते व येणारे कार्यकर्ते विचारात आहेत. आपला नेता उद्या आहे त्याच पक्षात राहील की पक्ष बदल करेल याची कुठलीही शाश्वती राहिली नाही. त्यांच्यासाठी जीवाचे रान करायचे व त्यांनीच आपल्याला आधांतरी सोडायचे हे प्रकार गेल्या काही वर्षात राज्यात अनेक ठिकाणी घडले आहेत. सोशल मीडियावर ही याबाबत चांगल्याच रील वेगवेगळ्या प्रकारे फिरत आहेत.         सर्वच कार्यकर्ते एक समान आहेत असे नाही काही उमेदवाराचे, ( नेत्यांचे) पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आजही आहेत पण ते मोजकेच. तुम्ही आमच्याकडे येणार तेही निवडणुकीपूरतेच तर याना का सोडायचे. असा पवित्रा अनेकांनी घेतला आहे. याचा चांगला अनुभव महापालिका सभागृहाची मुदत समपल्यावर आला होता. आता निवडणूक होणार म्हणून अनेकांनी कार्यकर्त्यांसाठी सहली, त्याचा खर्च, जेवणाच्या पंगती उठल्या. पण झाले उलटेच निवडणुका लांबल्या. हे हात आखडले गेले. अनेकांची सम्पर्क कार्यालये बंद झाली. काही नेते भेटेनासे झाले. पण आता हेच नेते लोकसभेच्या निमित्ताने पुढे आले आहेत. भविष्यातील महापालिका व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आपलेसे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणMONEYपैसाVotingमतदानElectionनिवडणूक