शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

रहाटणीत भरतोय बिनशिक्षकाचा वर्ग

By admin | Published: August 30, 2016 1:01 AM

येथील पालिका शाळा क्रमांक ५५ मुले येथील सातवीच्या शाळा सुरू झाल्यापासून अद्याप शिक्षकच नसल्याने विद्यार्थी दुपारी येतात व सायंकाळी न शिकता घरी जातात.

रहाटणी :  येथील पालिका शाळा क्रमांक ५५ मुले येथील सातवीच्या शाळा सुरू झाल्यापासून अद्याप शिक्षकच नसल्याने विद्यार्थी दुपारी येतात व सायंकाळी न शिकता घरी जातात.याला जवाबदार कोण, असा सवाल पालक उपस्थित करीत आहेत. या शाळेत सकाळी मुलींची व दुपारी मुलांची शाळा भरते. मुलींच्या वर्गाची संख्या ५६० पटसंख्या आहे, तर मुलांच्या वर्गाची ५३० पटसंख्या आहे. येथे पहिली ते सातवी असे वर्ग भरतात. या शाळेला मागील फेब्रुवारी २०१६पासून मुख्याध्यापकच नाही. सर्व कामकाज येथील एक शिक्षिका प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहत आहेत. या शाळेला संच मान्यतेनुसार १८ शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या १२ शिक्षकच कार्यरत आहेत. खरे तर या शाळेला एक मुख्याध्यापक, ५ पदवीधर , १२ उपशिक्षक अशा पद्धतीने शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, मुख्याध्यापक नाही, दोन पदवीधर शिक्षक कमी आहेत. तर एक उपशिक्षक सक्तीच्या रजेवर आहे. त्यामुळे कार्यरत आहेत त्या उपशिक्षकांना वरच्या वर्गाला शिकविता येत नाही. म्हणून सातवीचा वर्ग शिक्षकाविना आहे. या वर्गाची पटसंख्या ४४ आहे. या शाळेत पदवीधर शिक्षकाची आवश्यकता असतानासुद्धा कोणाच्या मर्जीमुळे बदली करण्यात आली, हा खरा प्रश्न आहे.शाळा सुरू होऊन अडीच महिने झाले, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे काय? काही दिवसांवर सहामाही परीक्षा येणार. विद्यार्थी शिकणार कधी? परीक्षेत लिहिणार काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार ३० पट संख्येला एक शिक्षक असावा लागतो. मात्र, पालिकेच्या अनेक शाळांमध्ये पटसंख्या नसतानाही शिक्षक मुबलक आहेत . काही शाळांमध्ये २० पटसंख्या असणारे वर्ग आहेत, तरी त्या ठिकाणी शिक्षक आहेत. तर काही शाळांमध्ये वर्ग नसतानाही अतिरिक्त शिक्षक आहेत. याकडे पालिकेचे शिक्षण विभाग व शिक्षण मंडळ डोळेझाक का करीत आहेत, हा खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)