शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

चारसौ पार हे राज्यघटनेत बदल करण्यासाठीच; ही बाब देशाच्या दृष्टिने चिंताजनक - शरद पवार

By राजू इनामदार | Updated: March 11, 2024 16:38 IST

विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर इडी कारवाईची दहशत बसवली जातीये, शरद पवारांचा आरोप

पुणे: भारतीय जनता पक्षाकडून वारंवार लोकसभा निवडणूकीत यंदा ४०० पार असा सांगितले जात आहे. राज्यघटनेत बदल करण्यासाठीच त्यांना ही संख्या गाठायची आहे असे त्यांच्याच एका वजनदार मंत्र्यांचे अलीकडेच सांगितले. ही बाब देशाच्या दृष्टिने चिंताजनक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर इडी कारवाईची दहशत बसवली जात आहे असा आरोपही त्यांनी केली.

मोदी बाग या पुण्यातील निवासस्थानी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी भाजपला लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) राज्य प्रवक्ते तसेच खासदार वंदना चव्हाण यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, सन २०१४ ते २०२२ या काळात भाजपच्या सरकारने देशात १३१ जणांवर कारवाई केली. त्यामध्ये भाजपचा एकही मंत्री नाही. काँग्रेसने सन २०१४ ते २०१४ या काळात २६ कारवाया केल्या. त्यात ५ काँग्रेसचेच मंत्री होते. याचा अर्थ डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ईडीची गैरवापर झाला नाही असा तर आहेच, पण यांच्या काळात ईडी आयुधासारखी वापरली जात आहे असाही आहे.

राजकीय हेतूने, सुडापोटी या गोष्टी केल्या जात आहेत.  माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार संजय राऊत यांच्या कारवाईत काय आढळले? विरोधी पक्षाच्या अनेक उमेदवारांवर त्यांनी निवडणुकीला उभेच राहू नये यासाठी इडीचा दबाव टाकला जात आहे. आमदार रोहित पवार यांच्यावरील कारवाई तेच सांगते आहे. रविंद्र वायकर शिंदे गटात केले. त्यांच्याविरोधात कारवाई सुरू होती, आता ती थांबली. हा प्रकार काय आहे? असा प्रश्न पवार यांनी केला. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ पवार यांनी इडीच्या कारवाईची आकडेवारी असलेली कागदपत्रेच पत्रकार परिषदेत सादर केली.

आमदार निलेश लंके पुन्हा आमच्याकडे येणार का ते माहिती नाही. बाहेर गेलेले बरेच लोक अस्वस्थ आहेत हे खरे आहे असे पवार म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या हेतूबाबत शंका घेणार नाही. ते आमच्याबरोबर बोलतात, आम्ही त्यांच्या बरोबर बोलतो आहोत. त्यामुळे यावर आताच बोलणार नाही. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र आहेत. देशस्तरावर त्यात्या पक्षाने बोलणी करावीत असे ठरले आहे. त्याप्रमाणे चर्चा सुरू आहेत.  कोल्हापूरातून शाहू महाराज यांनी उभे रहावे असा मी त्यांच्याकडे आग्रह धरला आहे. ते उभे राहिले तर आनंदच आहे असे पवार म्हणाले.

 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपा