शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी मानसिकता बदला : डॉ.भालचंद्र मुणगेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 7:39 PM

कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे असे मत डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

पुणे: कोरोनापूर्वीचे जग आणि कोरोना नंतरचे जग यात प्रचंड तफावत असणार आहे .शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद असणार नाही.त्यामुळे कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

भारती विद्यापीठाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.मुणगेकर यांनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर युट्युब चॅनेलच्या माध्यमातून या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, राज्याचे कृषी व सहकार  राज्यमंत्री, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि  प्र.कुलगुरू डॉ. विश्वजित कदम,कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, सहकार्यवाह डॉ.के.डी.जाधव, डॉ.एम. एस. सगरे, व.भा. म्हेत्रे ,कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.

डॉ.मुणगेकर म्हणाले, कोरोनाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार असून त्याची मोठी किंमत भारतासारख्या विकसनशील देशाला मोजावी लागणार आहे. विकास दरात ऐतिहासिक घसरण होणार असून बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.अशा काळात नोकरीच्या मागे न लागता विद्यार्थी स्वतःच्या कुवतीनुसार छोटे मोठे उद्योग करून अर्थार्जन  करू शकतील,असे सामर्थ्य विद्यापीठांना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावे लागेल.

प्राध्यापकानी केवळ ग्रंथालयात बसून अभ्यासक्रम न ठरवता औद्योगिक क्षेत्रातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत, याचाही विचार केला पाहिजे. लॉकडाऊन संपल्यानंतर पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आणि जनतेशी संवाद साधून पुढची दिशा काय असेल, हे स्पष्ट केले पाहिजे. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची संधी मिळाली असती तर चार कोटी मजुरांची ससेहोलपट झाली नसती,असेही मुणगेकर म्हणाले.

डॉ.विश्वजित कदम म्हणाले,  भारती विद्यापीठाच्या माध्यमातून डॉ.पतंगराव कदम यांनी बहुजन समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवली. भारती विद्यापीठाने केवळ पदवीधर नाही तर देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार केले. कोरोनाच्या संकटात डॉक्टर, नर्सेस, पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी आपल्या प्राणाची पर्वा न करता जे योगदान देत आहेत. त्याविषयी आपण कायम कृतज्ञ राहिले पाहिजे. कोरोना नंतर येणारी आव्हाने पेलण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांनी सज्ज असले पाहिजे.

कोरोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. संशोधनात मानवी समूहाचे अस्तित्व टिकवण्याचे सामर्थ्य असले पाहिजे.  संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा आहे,असे आपण आजवर म्हणत होतो. समाजाचे प्राण वाचविण्याचे काम संशोधनातून झाले पाहिजे.ही काळाची गरज आहे. -डॉ.शिवाजीराव कदम ,कुलपती, भारती विद्यापीठ, 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरEducationशिक्षण