शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

"काही जण सुपात तर काही जात्यात.."; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 17:11 IST

"काही काळजी करु नका, परमेश्वर सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करतो.." अशा शब्दात मार्मिक टिपण्णी देखील चंद्रकांत पाटलांनी केली आहे. 

 पुणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याच दरम्यान देशमुख यांनी आरोपांची चौकशी होईपर्यंत पदावर राहणे योग्य नाही असे म्हणत आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आता सीबीआयकडून आज ( दि. २४) देशमुख यांच्या नागपूरमधील येथील निवासस्थानी छापा कारवाई केली आहे.

या कारवाईनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी '' काही जण सुपात तर काही जण जात्यात असल्याची प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसेच काही काळजी करु नका, परमेश्वर सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करतो अशा शब्दात मार्मिक टिपण्णी देखील केली आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. पाटील म्हणाले, अनिल देशमुखांच्या घरावरील सीबीआयचा छापा ही कायदेशीर बाब आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. तसेच सिंह यांच्या आरोपांवरुन अनिल देखमुखांविरोधात सीबीआय चौकशी केली जाते तर वाझेने ऑन पेपर अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. परब यांनी देखील मुंबई महापालिकेच्या नावाचा वापर करून अनेकांना धमकावत पैसे घेतल्याचे वाझेने सांगितले आहे. त्यांचीही चौकशी झालीच पाहिजे असेही पाटील यावेळी म्हणाले. आहे.

हसन मुश्रीफ यांचं ही कारवाई भाजपाचा कट असल्याचं म्हणणं हास्यास्पद 

अनिल देशमुखांच्या नागपूर येथील घरी सीबीआयने छापा कारवाई केल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सीबीआयच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारला लक्ष्य केले होते.तसेच देशमुखांवरील कारवाई भाजपचा कट असल्याचे मत ठाकरे सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले होते. मात्र त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना पाटील यांनी मुश्रीफ यांचे मत हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे . 

सत्तेचा दुरुपयोग करून आघाडी सरकारला बदनाम केलं जातंय.. मलिकांचा आरोप 

सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "सीबीआयला संशय असेल तर चौकशी किंवा धाडी टाकू शकतात शिवाय गुन्हा दाखल करु शकते. परंतु पहिल्या दिवसापासून ज्यापद्धतीने हे प्रकरण तयार करण्यात आले आहे यावरुन हे राजकारणच सुरू असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला

काय आहे प्रकरण... 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप केला होता. या प्रकरणी सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने नंतर अनिल देशमुख व संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागraidधाडPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारBJPभाजपा