शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांपुढे वेळेत ऊस गाळपाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 2:14 PM

पुणे जिल्ह्यात बारामती,इंदापुर,दौंड,आंबेगाव,जुन्नर हे तालुके ऊसाचे आगार म्हणुन ओळखले जातात.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका; अतिरीक्त ऊसाचा प्रश्न भेडसावणार

प्रशांत ननवरे-बारामती : पुणे जिल्ह्यातील २०२०-२१ चा ऊस गळीत हंगाम सुरु होऊन एक महिना पूर्ण होत आहे.गतवर्षी गळीत हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेले कोरोनाचे संकट अद्याप देखील घोंघावत आहे. कोरोना संकटातच यंदाचा हंगाम सुरु झाला आहे. साखर कारखानदारीला यंदा अतिवृष्टीचा फटका  बसला आहे.अतिवृष्टीमुळे साखर कारखानदारी उशिरा सुरु झाली आहे.चांगल्या पर्जन्यमानामुळे ऊसपिकाची यंदा मुबलक उपलब्धता आहे.सर्वच कारखान्यांना कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप वेळेत उरकण्याचे तसेच कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना जाऊ नये यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे.

ऊस हे नगदी पिक मानले जाते.जिल्ह्यात बारामती,इंदापुर,दौंड,आंबेगाव,जुन्नर हे तालुके ऊसाचे  आगार म्हणुन ओळखले जातात. या तालुक्यांमधुन शेतकरी सुरु,पुर्वहंगामी,आडसाली ऊसाचे उत्पादन घेतात.तर काही खोडव्याचे उत्पादन घेतात.यंदा ऊस गाळपात खासगी ,तर साखर उताऱ्यात सहकारी कारखाने आघाडीवर असल्याचे चित्र  आहे. बारामती ऍग्रो साखर कारखान्याने आतापर्यंत तब्बल ३,९४,०३० मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. त्यांचा सरासरी साखर उतारा ८.५१% आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १,७७,०५० मे.टन ऊस गाळप करत सरासरी १०.१८% चा साखर उतारा राखत बाजी मारली आहे.

पुणे जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचे आतापर्यंतचे एकुण ऊस गाळप २४ लाख ३० हजार ६७० टन झाले आहे.तर साखर उत्पादन २० लाख ३४ हजार ७३५ टन झाले आहे.कारखानानिहाय ऊस गाळप आणि साखर उतारा पुढीलप्रमाणे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (१,७७,०५० मे.टन) (१०.१८%), माळेगाव सहकारी साखर कारखाना (१,७५,८००मे.टन) (१०.१०%), छत्रपती सहकारी साखर कारखाना (१,५१,१०० मे.टन ) (९.४६%), निरा भिमा सहकारी साखर कारखाना (१,७१६२२ मे.टन) (उपलब्ध नाही), घोडगंगा साखर कारखाना (१,३७,५१० मे.टन) (१०.६६%), संत तुकाराम साखर कारखाना (९७,६८० मे.टन) (९.२९%), भिमाशंकर सहकारी साखर कारखाना (९४००० मे.टन) (९.६३%), बारामती अ?ॅग्रो (३,१०,८५० मे.टन) (८.५१%), दौंड शुगर (२,१२,३०० मे.टन) (९.०२%),  अनुराज शुगर्स लि. (१,२८३३० मे.टन) (९.५४%), श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना (१,७७,८८१मे.टन) (९.१८%), विघ्नहर सहकारी साखर कारखाना (१,८९८७०मे.टन)(९.६०%), कर्मयोगी सहकारी साखर कारखाना २ लाख ५४०० मे.टन,(९.६०% )———————————————

 जिल्ह्यातील साखर कारखाने -१६ आतापर्यंत किती उसाचे गाळप (२४ लाख ३० हजार ६७० टन झाले आहे)—————————————अधिक गाळप करण्यासाठी सर्वच कारखाने प्रयत्नशील असतात.त्यामुळे जिल्हा कार्यक्षेत्राबाहेर जावुन ऊसाची पळवापळवी होते.पुणे जिल्ह्यातुन अहमदनगर,सोलापुर,सातारा जिल्ह्यात ऊस गाळपासाठी जातो.—————————————

 ऊस उत्पादक शेतकऱ्याची प्रतिक्रिया —

यंदा उसाचे मुबलक उत्पादन आहे .त्यामुळे उसाची तोड वेळेवर होत नाही .इंदापुर तालुक्यात सहकारी साखर कारखान्यापेक्षा खाजगी कारखान्याकडे जास्त उसाचा पुरवठा होत आहे .दराच्या तुलनेतही खाजगी कारखाने जादा दर देतात. मात्र ,खाजगी कारखाने क्रमवारीने तोड न करता पंसतीनुसार वशीलबाजीने तोडणी करतात .उसाला अतिवृष्टी नुकसानभरपाईही मिळाली नाही.

रणजित खारतोडे, कळस

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीRainपाऊस