शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केंद्राचा निर्णय अन्यायकारक; सरकारची शेतकऱ्यांबरोबर लबाडी, डॉ. बाबा आढावांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 14:19 IST

शेतकरी जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा असणार

पुणे : आपल्या देशामधून परदेशामध्ये सर्वात जास्त कांदा निर्यात केला जातो. तो कांदा आता निर्यात करताना त्यावर 40% कर व अतिरिक्त 10 टक्के सेस देखील लावणार आहे. असे करून शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय केला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर लबाडी करत आहे. आम्ही सर्वजण पहिल्यापासून शेतकऱ्यांबरोबर आहे. आम्ही शेतकऱ्याच्या अवलादीचे आहोत. यापुढे शेतकरी जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा असेल. अशी भूमिका जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी मांडली.

जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली कांदा निर्यातीवर लावलेला कर रद्द करावा. या मागणीकरिता शेतकरी व कष्टकरी यांच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणविरोधात कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या कार्यालयाबाहेर अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

आढाव म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आता नवीन ठिणगी पडलेली आहे. शेतकरी वर्ग न्याय मागण्यासाठी वर्षानुवर्षे लढत आहे. मागे सरकारने लावलेले तीन कायदे मागे घेतले परंतु नव्याने शेतकऱ्यासमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. यापुढे शेतकरी जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा असेल

श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे म्हणाले, कांदा निर्यातीवर 40 टक्के लावलेला कर तातडीने रद्द केला पाहिजे. नाहीतर आजूबाजूच्या देशाना त्यांचा फायदा होईल. तसेच निर्याती कर बरोबर 10 टक्के सेस देखील वसुल करणार असल्याचे समजते. त्याचा परिणाम कांदा उत्पादक हा बाजार आवरामध्ये कांदा घेऊन येणार नाही. 1 लाखाचा कांदा निर्यात केल्यास 50 हजार रुपये  शासनास अगोदर भरावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील निर्यात शुल्क नसावे अशीच भूमिका घेतली आहे.

सदर आंदोलनामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियन, हमाल पंचायत, तोलणार संघटना, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना, टेम्पो पंचायत, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती. पथारी पंचायत, मोलकरीण संघटना, इ. संघटनांचे प्रतिनिधी शेतकरी कामगार आदी सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारSocialसामाजिक