शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 13:18 IST

युतीत असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भांडते. मग त्यांच्याबरोबरच शिवसेना जाऊन लग्न करते, हा तर राजकारणाचा खेळ

पुणे: आधी मराठा, ब्राह्मण वाद लावला. मग भांडारकर फोडले. जेम्स लेन कुणी वाचला पण नसेल... हे पुस्तक बंद करा हे पहिल्यांदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. पण त्यांना वाईट ठरविण्यात आले. हे सगळे शरद पवार (Sharad Pawar) यांचे राजकारण आहे. हा सगळा जातीचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर सुरू झाला आहे, अशा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारार्थ कोथरूडमधील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ आयाेजित सभेत ते बाेलत हाेते.

जरांगे पाटील यांची आरक्षण मागणी तांत्रिकदृष्ट्या निरर्थक 

मनाेज जरांगे पाटील यांची आरक्षणाची मागणी तांत्रिकदृष्ट्या होऊ शकणार नाही. तुम्हाला राजकारणी चुकीचे सांगत आहेत. त्यासाठी नवा कायदा करावा लागेल. ही केवळ महाराष्ट्रापुरते राहणार नाही तर उद्या इतर राज्ये उठतील आणि मागणी करतील. मागणी करताना ते पूर्ण करतील का? हे पाहायला हवे. केवळ स्वतःच्या राजकारणासाठी तुमच्यात भांडणे लावली जात आहेत. हा साधुसंतांचा महाराष्ट्र, फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तोच महाराष्ट्र आज चाचपडत आहे. निवडून येण्यासाठी जात वापरतात आणि मग निवडून आल्यावर दुसरी जात बघतात. राष्ट्रवादी काँग्रेसने यात भर घातली, असेही ठाकरे म्हणाले. आरक्षण हे सगळे शिक्षण नोकऱ्यासाठी मागत आहेत. आता सरकारी नोकऱ्याच संपल्या आहेत. भरती होत नाही. मग आपण कुठल्या आरक्षणाच्या गोष्टी करत आहोत. कुठून आरक्षणातून नोकऱ्या मिळणार आहेत? ही लोक फक्त तुमच्यात आग लावत आहेत. आम्ही रोजगार, वीज, नोकऱ्या देऊ यावरच ५२ सालापासून निवडणुका होताहेत. यात काही बदल झालेला नाही, असेही ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील मतांचा अपमान

महाराष्ट्रातल्या मतांचा आज अपमान झाला आहे. शिवसेना भाजप पूर्ण बहुमतात होती. त्यानंतर अचानक पहाटेचा शपथविधी झाला आणि तो मोडला. इतकी वर्षे युतीत असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भांडते. मग त्यांच्याबरोबरच शिवसेना जाऊन लग्न करते आणि म्हणे मी मुख्यमंत्री. ही तुमच्या मतांची प्रतारणा नव्हे का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. हे सगळे हसण्यावरी नेताय. तो मतदारांच्या अस्तित्वाचा अपमान आहे. आपण राजकारण खेळ समजतोय. दुधाचे भाव, विजेचे भाव राजकारणी ठरवतात. कुणी कुणाबरोबर जाते. कारण तुम्ही राजकारण हसण्यावरी नेत आहात. हा विनोदाचा नव्हे तर गंभीर विषय आहे. नेत्यांच्या पापांवर पांघरून घालायचे का? तर हा आमचा जातीचा आहे. अशाने सगळे बरबाद होऊन जाईल. आपण महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस