शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:05 IST

BJP MP Nishikant Dubey: संघ स्वयंसेवक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.

BJP MP Nishikant Dubey: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. वंदे मातरम् मुद्द्यावर दोन्ही सभागृहात चर्चा सुरू असून, लोकसभेत मतचोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त आणि निवडणूक प्रक्रिया यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करत निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिले. 

मी प्रश्न विचारू इच्छितो, ज्यामुळे हे स्पष्ट होईल की, भाजपा भारताच्या लोकशाहीला हानी पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरत आहे. निवडणूक आयोगाचा वापर करत आहे. पहिला प्रश्न, निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढून टाकण्यात आले? ते त्या बैठकांना का नाहीत? मी तिथे होतो. हा तथाकथित लोकशाही निर्णय आहे. एका बाजूला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह. दुसरीकडे विरोधी पक्षनेते. परंतु, आम्हाला तिथे काहीच बोलता येत नाही. ते जे ठरवतात तेच घडते. पंतप्रधान आणि अमित शाह निवडणूक आयुक्तांची निवड करण्यास इतके उत्सुक का आहेत? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. तसेच मतचोरी हे सर्वांत मोठे देश विरोधी कृत्य आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

काँग्रेसनेच संविधान कलंकित केले

राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने भारताच्या संविधानाला कलंकित केले आहे; इंदिरा गांधी यांनीच मत चोरी करून रायबरेली येथे विजय मिळवला. संघ स्वयंसेवक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे निशिकांत दुबे यांनी सांगितले. तसेच सन १९८७ मध्ये एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनीच देशात ईव्हीएम मशीन आणली होती, याची आठवण निशिकांत दुबे यांनी करून दिली. दुसरीकडे, भाजपाच्या संजय जयस्वाल यांनी राहुल गांधी यांचे 'मत चोरी'चा मुद्दा आणल्याबाबत आभार मानले. राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून केलेल्या आरोपांमुळे एनडीएचा बिहार विजय झाला, असे म्हटले आहे. 

दरम्यान, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे आरएसएसचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सर्व संस्थांवर नियंत्रण आणू पाहत आहे. मी काहीही चुकीचे बोलत नाही. संघाने शैक्षणिक संस्था ताब्यात घेतल्या आहेत. कुलगुरूंची नियुक्ती गुणवत्तेवर नव्हे तर एका संस्थेशी संलग्नतेवर आधारित करण्यात आली आहे. CBI आणि ED एकाच संस्थेशी संबंधित व्यक्तींनी ताब्यात घेतले आहेत. देशातील निवडणुका नियंत्रित करणारी तिसरी संस्था निवडणूक आयोग दुसऱ्या संस्थेद्वारे नियंत्रित केली जाते. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress tainted constitution, Indira Gandhi won by vote theft: Dubey

Web Summary : Nishikant Dubey accuses Congress of vote theft, citing Indira Gandhi's victory. Rahul Gandhi questioned election integrity, prompting rebuttals. Dubey defends RSS, while Gandhi alleges RSS control over institutions and election manipulation.
टॅग्स :ParliamentसंसदIndira Gandhiइंदिरा गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा