शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

बीअारटी मार्ग की अपघात प्रवण क्षेत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:38 PM

बीअारटी मार्गामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पीएमपी बसचे 18 अपघात झाले असून त्यात 3 प्राणांतिक अपघात झाले अाहेत.

पुणे :  उपनगरातील प्रवाशांना जलद बससेवा मिळावी यासाठी बीअारटी बससेवा सुरु करण्यात अाली. शहरातील विविध मार्गांवर ही सेवा सुरु करण्यात अाली. सुरुवातीपासूनच यामध्ये अनेक त्रृटी असल्याचे समाेर अाले हाेते. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे त्या सुधारण्याचा फारसा प्रयत्न हाेत नसल्याचे चित्र अाहे. गेल्या वर्षभरात बीअारटी मार्गांमध्ये बीअारटी बसेसचे एकूण 18 अपघात झाले असून या अपघातांमध्ये 3 जणांना अापले प्राण गमवावे लागले अाहेत. 

     बीअारटी मार्गातील अडचणींची मालिका संपता संपत नसल्याचे चित्र अाहे. खासकरुन संगमवाडी ते विश्रांतवाडी अाणि नगरराेड वरील मार्गांमध्ये अनेक त्रृटी अद्याप राहिल्या अाहेत. बीअारटी मार्गातील सर्वात माेठी अडचण ही या मार्गांमध्ये हाेणारी खासगी वाहनांच्या घुसखाेरीची अाहे. दरराेज अनेक खासगी वाहने या बीअारटी मार्गांमध्ये घुसखाेरी करतात. ही वाहने तसेच बस वेगात असल्याने अनेक प्राणांतिक अपघात या मार्गात घडले अाहेत. ही घुसखाेरी राेखण्यासाठी ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात अाली हाेती. परंतु त्यांचे सुद्धा वाहनचालक एैकत नसल्याचे चित्र अाहे. त्यानंतर पीएमपी कडून हे मार्ग सुरु हाेतात तेथे रस्सी लावण्याचा प्रयत्न केला. याने थाेडा फरक पडला असला तरी अनेक वाहनचालक दमदाटी करुन वाॅर्डनला ही रस्सी खाली घेण्यास भाग पाडतात. तसेच रात्रीच्या वेळी हा मार्ग माेकळाच असताे. त्यामुळे खासगी वाहने बेधडकपणे या मार्गातून जात असतात. संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गात काही भागातील वळणे ही अपघाताला निमंत्रण देणारी अाहेत. त्यात कुठलिही सुधारणा करण्यात अाली नाही. त्यामुळे  पीएमपी प्रशासन या मार्गांकडे गंभीरतेने पाहत नसल्याचे चित्र अाहे. 

    पीएपीकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात बीअारटी मार्गांमध्ये पीएमपी बसचे 18 अपघात झाले अाहेत. त्यात 3 लाेकांना अापला प्राण गमवावा लागला अाहे तर दाेन जण गंभीर जखमी झाले अाहेत. 13 किरकाेळ अपघात झाले अाहेत. पीएमपी बसेस व्यतिरिक्त खासगी वाहने एकमेकांना धडकून झालेल्या अपघातांची संख्याही अधिक अाहे. त्यामुळे हा बीअारटी मार्ग म्हणजे मृत्यूचा मार्ग ठरत अाहे. याबाबत बाेलताना पीएपपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी म्हणाले, उपनगरातील नागरिकांना जलद बससेवा मिळावी यासाठी बीअारटी सुरु करण्यात अाली. परंतु बीअारटी मार्ग सुरु करताना ज्या प्राथमिक गाेष्टींची पुर्तता करणे अावश्यक अाहे त्या केल्या गेल्याच नाहीत. फक्त बीअारटी बसेससाठीच हा डिडीकेटेड काॅरिडाॅर असणे अावश्यक हाेते, परंतु तसे ते दिसत नाही. त्यामुळे जलद वाहतूकीचे जे पीएमपीचे उद्दीष्ट हाेते तेच फाेल ठरले अाहे. प्रशासनाकडून या मार्गांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याचा परिणाम या अपघातांमधून दिसून येत अाहे. या मार्गांमध्ये सुधारणा करण्याची प्रशासनाची इच्छा शक्ती नाही. यात सामन्य नागरिकांचा हाकनाक जीव जात अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPune BRTपुणे बीआरटीVishrantwadiविश्रांतवाडीPMPMLपीएमपीएमएल