शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

एमपीएससी’च्या सर्व परीक्षांना बायोमेट्रिक हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 19:04 IST

यापुढील पुर्व परीक्षांसाठीही आता ही पध्दत अवलंबण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देयापुर्वी तीन-चार मुख्य परीक्षांना ही पध्दत आयोगाने सुरूवातीला मुख्य परीक्षांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्यास सुरूवातबोगस विद्यार्थी टाळण्यासाठी ही प्रक्रिया योग्य असल्याची अनेक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

पुणे : बोगस विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) आता मुख्य परीक्षांसह सर्व पुर्व परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याच्या विचारात आहे. यापुर्वी तीन-चार मुख्य परीक्षांना ही पध्दत वापरण्यात आली. तर रविवारी (दि. २३) पहिल्यांदाच आयोगाने महिला व बाल विकास विभागाच्या गट ब पदाच्या पुर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेतली. यापुढील पुर्व परीक्षांसाठीही आता ही पध्दत अवलंबण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विविध विभागातील भरतीसाठी आयोगामार्फत परीक्षा घेतल्या जातात. थेट भरती, स्पर्धात्मक परीक्षा, विभागीय परीक्षा, मर्यादीत परीक्षा घेतल्या जातात. प्रामुख्याने थेट भरती व स्पर्धात्मक परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरात असते. स्पर्धात्मक परीक्षा या साधारणपणे पुर्व, मुख्य व मुलाखत या स्वरूपाच्या असतात. तर थेट भरती परीक्षांमध्ये पुर्व व मुलाखत अशी प्रक्रिया असते. पुर्व परीक्षेच्या तुलनेत मुख्य परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची संख्या खुप कमी असते. त्यामुळे आयोगाने सुरूवातीला मुख्य परीक्षांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्यास सुरूवात केली. मागील काही महिन्यांत झालेल्या तीन ते चार परीक्षांसाठी ही हजेरी घेण्यात आली. पण पुर्व परीक्षेसाठी आतापर्यंत बायोमेट्रिकचा वापर करण्यात आला नव्हता. आयोगाकडे सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आहेत. त्याआधारे विद्यार्थ्यांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.रविवारी (दि. २३) आयोगामार्फत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, अधिक्षक, अधिव्याख्याता, सांख्यिकी अधिकारी गट ब या पदांसाठी पुर्व परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर बायोमट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली होती. एखाद्या पुर्व परीक्षेसाठी पहिल्यांदाच अशी चाचपणी करण्यात आली. परीक्षा कक्षामध्ये जाण्यापुर्वीच विद्यार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा आणि छायाचित्र घेण्यात आले. या प्रक्रियेनंतर ओळखपत्राच्या झेरॉक्सवर हॉलमार्क लावण्यात आले. त्यानंतरही परीक्षा कक्षात प्रवेश दिला जात होता. तसेच परीक्षेवेळीही छापील छायाचित्रासमोर अंगठ्याचा ठसा घेतला गेला. बहुतेक विद्यार्थ्यांसाठी हे नवीन होते. पण बोगस विद्यार्थी टाळण्यासाठी ही प्रक्रिया योग्य असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीEducationशिक्षणGovernmentसरकार