शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

गेल्या आठ महिन्यांपासून भाटघर वीजनिर्मिती केंद्र बंद; आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 2:32 PM

मुसळधार पावसामुळे भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्रात शिरले होते पाणी

ठळक मुद्देकेंद्रात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात, दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

भोर : मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाटघर येथील विद्युत मंडळाच्या महापारेषण व वितरण कंपनीच्या वीजनिर्मिती केंद्रात पाणी शिरल्यामुळे यावर्षी वीजनिर्मिती केंद्र मागील आठ महिने बंद आहे. यामुळे आतापर्यंत ४० मिलियन युनिटचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान झाले आहे आणि कदाचित यात वाढ होऊ शकते. वीजनिर्मिती केंद्रात अशा प्रकारचे नुकसान पहिल्यांदाच झाले आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून पुढील दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी काम पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.पाच ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्रात पाणी जाऊन मागील आठ महिन्यांपासून वीजनिर्मिती केंद्र बंद असून मागील चार वर्षांत वीजनिर्मिती केंद्र बंद पडण्याची ही पहिलीच घटना असून त्यामुळे आतापर्यंत सरासरी ४० मिलीयन युनिटच्या विजेचे आणि सुमारे ११ कोटींचे नुकसान झाले असून त्यात वाढही होऊ शकते. मात्र हे सर्व अंदाज वीज केंद्राच्या दुरुस्तीच्या कामानंतरच नुकसानीचा अंदाज येणार असल्याचे भाटघर वीज उपकेंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वास देशपांडे व भाटघर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सुनील वाल्हेकर यांनी सांगितले.सध्या भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्राच्या दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम सुरू असून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.मे अखेर काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी ३ ते ५ आॅगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे ४ आॅगस्टला भाटघर धरण पूर्ण भरल्यावर पाणी येथील वीजनिर्मिती केंद्राच्या पहिल्या दोन मजल्यांवर शिरल्यामुळे रोहित्र पॅनल जळाले. जनरेटर पाण्यात गेले, त्यामुळे भोर शहरासह सुमारे ६० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर भोरच्या अग्निशमन बंबाने व वीज वितरण महापारेषण कंपनी एक आठवडाभर वीज केंद्रातील पाणी बाहेर काढत होते. यावेळी सलग तीन-चार दिवस आमदार संग्राम थोपटे घटनास्थळी राहून वीजनिर्मिती कंपनीला मदतकार्य करून कामकाजाची माहिती घेत होते.........

पर्यायी व्यवस्था : ६० गावांचा वीजपुरवठा होणार पूर्ववतवीज वितरण कंपनीच्या वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर पर्यायी व्यवस्था करून शहरासह ग्रामीण भागातील ६० गावांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला. यातून निर्माण झालेली वीज १३२ केव्ही कामथडी आणि शिरवळ केंद्राला पुरवली जाते. साधारणपणे धरणातील पाणी दरवर्षी आॅक्टोबर ते मेअखेरपर्यंत दुष्काळी भागातील पिकांसाठी व पिण्यासाठी सोडले जाते. त्या कालावधीत वीजनिर्मिती केली जाते............* पावसाच्या पाण्यामुळे वीजनिर्मिती कें द्रातील जनरेटर, तळाचे टर्बाईन, बॅटरी, कॉम्पॅक्टर, आॅईल, वायरिंग यासारखे पूरक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनरेटर बाहेर काढायला एक महिना लागला असून जनरेटर, हिटिंग, ड्राइंगचे काम सुरू असून त्याच्या दुरुस्तीसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

* काम पूर्ण झाल्यावरच झालेले नुकसान व खर्च याची महिती कळू शकणार आहे. दरवर्षी ४० मिलियन युनिटची वीजनिर्मिती केली जाते. मागील वर्षी ५४ मिलीयन युनिट वीजनिर्मिती झाली होती आणि यावर्षी अधिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

* पावसामुळे सर्वच अंदाज फेल ठरले असून वीजनिर्मिती केंद्राच्या दुरुस्तीचे अवघड काम पारेषण व वितरण कंपनीवर येऊन पडले आहे. 

टॅग्स :bhor-acभोरelectricityवीजRainपाऊस