शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पाडले बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 18:45 IST

प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. 

ठळक मुद्दे१०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय पुण्याला पाणी नेऊ देणार नाहीकाम बंद करणे हाच शेवटचा पर्याय भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य होत नसल्याचे चित्र

आंबेठाण : भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल व जलवाहिनीचे काम आज ( दि. ७) रोजी दुपारी बंद पाडले.गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत शासनाकडून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच भविष्यातही आपल्या मागण्या मान्य होणार नसल्याचे लक्षात आल्यानेच हे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.    भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य होत नसल्याचे चित्र दिसत असल्याने प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आज ( दि.७) करंजविहिरे येथे बैठक घेतली. यावेळी जॅकवेल व जलवाहिनीचे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी लक्ष्मण पासलकर म्हणाले, काम बंद करणे हाच शेवटचा पर्याय असून,१०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय पुण्याला पाणी नेऊ देणार नाही.याच सभागृहात आमदारांनी शब्द दिला होता. प्रत्येक खातेदाराला खेड तालुक्यातील जमीन मिळाली पाहिजे. मात्र अजून एकही धरणग्रस्त शेतकऱ्याला जमिनी मिळाल्या नाहीत.पहिल्यांदा आमचे प्रश्न सोडवा अन् मग खुशाल पुण्याला पाणी द्या.. पण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही याप्रमाणे जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम बंद केल्याशिवाय शासनाचे डोळे उघडणार नाहीत, असे बैठकीत ठरल्याने आजपासून काम बंद करण्यात आले आहे.आता आम्हाला अटक करायची तर खुशाल करा आता आम्ही मागे हटणार नसल्याचे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले, असे उपस्थित धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.  यावेळी महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे सरचिटणीस लक्ष्मण पासलकर,पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले,देवीदास बांदल,गजानन कुडेकर,संदीप देशमुख,सुदाम शिंदे,किसन नवले,गणेश जाधव,पंडित मरगज यांच्यासह जवळपास एक हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दहिफळे, उपनिरीक्षक विक्रम पासलकर,मणेर,खाडे या पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस अधिकारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :KhedखेडDamधरणFarmerशेतकरीWaterपाणीPuneपुणेPoliceपोलिस