शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पाडले बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 18:45 IST

प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. 

ठळक मुद्दे१०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय पुण्याला पाणी नेऊ देणार नाहीकाम बंद करणे हाच शेवटचा पर्याय भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य होत नसल्याचे चित्र

आंबेठाण : भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल व जलवाहिनीचे काम आज ( दि. ७) रोजी दुपारी बंद पाडले.गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत शासनाकडून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच भविष्यातही आपल्या मागण्या मान्य होणार नसल्याचे लक्षात आल्यानेच हे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.    भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य होत नसल्याचे चित्र दिसत असल्याने प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आज ( दि.७) करंजविहिरे येथे बैठक घेतली. यावेळी जॅकवेल व जलवाहिनीचे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी लक्ष्मण पासलकर म्हणाले, काम बंद करणे हाच शेवटचा पर्याय असून,१०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय पुण्याला पाणी नेऊ देणार नाही.याच सभागृहात आमदारांनी शब्द दिला होता. प्रत्येक खातेदाराला खेड तालुक्यातील जमीन मिळाली पाहिजे. मात्र अजून एकही धरणग्रस्त शेतकऱ्याला जमिनी मिळाल्या नाहीत.पहिल्यांदा आमचे प्रश्न सोडवा अन् मग खुशाल पुण्याला पाणी द्या.. पण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही याप्रमाणे जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम बंद केल्याशिवाय शासनाचे डोळे उघडणार नाहीत, असे बैठकीत ठरल्याने आजपासून काम बंद करण्यात आले आहे.आता आम्हाला अटक करायची तर खुशाल करा आता आम्ही मागे हटणार नसल्याचे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले, असे उपस्थित धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.  यावेळी महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे सरचिटणीस लक्ष्मण पासलकर,पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले,देवीदास बांदल,गजानन कुडेकर,संदीप देशमुख,सुदाम शिंदे,किसन नवले,गणेश जाधव,पंडित मरगज यांच्यासह जवळपास एक हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दहिफळे, उपनिरीक्षक विक्रम पासलकर,मणेर,खाडे या पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस अधिकारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :KhedखेडDamधरणFarmerशेतकरीWaterपाणीPuneपुणेPoliceपोलिस