शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:06 IST

- पिंपळी परीसरात निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले

बारामती - गेल्या काही दिवसांपासून  बारामती परिसरात अतिवृष्टीने थैमान घातले आहे.त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच पिंपळी परीसरात  निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या चार दिवसांत गुरुवारी दुसरा पाहणी दाैरा करीत नुकसानीची माहिती घेतली.रविवारी(दि २५) बारामती शहर आणि परीसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पुरसदृश्य परीस`थिती निर्माण झाली.त्याच दिवशी उपमुख्यमंत्री पवार सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत बारामतीत पोहचले.सोमवारी (दि २६) दिवसभर पवार यांनी बारामती शहर तालुक्यासह इंदापुर तालुक्याचा पाहणी दाैरा करीत नुकसानीची माहिती घेतली.त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा  उपमुख्यमंत्री  पवार यांनी गुरुवारी(दि २९) पाहणी दौरा केला.. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यादरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकर्यासमवेत संवाद साधला.यावेळी पवार यांनी , पंचनामे उरकले का?धान्य देण्यास सुरवात झाली आहे,धान्य मिळाले का?असा सवाल करीत शासनाच्या उपाययोजनाबाबत माहिती देत शेतकर्यांना आश्वस्त केले.पवार म्हणाले, ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.  ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत.संपुर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे हे सगळ एका झटक्यात होणार नाही. शेतकऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल.मी त्या कामाच्या मागे आहे.इथ जरी बारामतीला असलो तरी सारखं माझे दोन दोन तासाला फोन चालले आहेत. मी सातत्याने याबाबत माहिती घेत आहे. मी इथुनच सह्याा करुन त्यांना पाठवतोय,तुम्ही काळजी करु नका,झालेल्या नुकसानीसाठी शक्य ती मदत करणार असल्याचे यावेळी पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार