शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

शाळा, महाविदयालयांची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही कॅमेरे बंद, शाळांमध्ये विद्यार्थिनी असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 8:56 AM

पालकांनीच शाळा व्यवस्थापनाला जागे करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जाब विचारायला हवा...

पुणे : दोन वर्षांनी शाळा सुरू झाल्या आहेत. पण तेथील अनेक सोयी-सुविधा बंद आहेत. त्या सुरू होणे आवश्यक आहे. शाळांमधील सीसीटीव्ही बंद पडले असून, त्यामुळे शाळेत कोण ये-जा करतो, ते समजत नाही. परिणामी अनुचित प्रकार घडू शकतात. नुकताच एका शाळेत तसा प्रकार घडला आहे. त्यामुळे शाळांनी पुन्हा आपल्या सर्व सोयीसुविधा सुरू कराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जर सीसीटीव्ही बंद असतील, तर मुली असुरक्षित होणार आहेत.

शहरात कब्बडी खेळाडू मुलीचा झालेला खून, दहावीतील मुलीवर केलेला प्राणघातक हल्ला या घटना ताज्या आहेत. त्यातच शहरातील मध्यवर्ती भागातील शाळेतील मुलीवर शाळेच्या आवारात येऊन एका अनोळखी व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली. परिणामी शाळा-महाविद्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालकांनीच शाळा व्यवस्थापनाला जागे करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जाब विचारायला हवा.

शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. आपली मुले सुरक्षित वातावरणात शिक्षण घेत आहेत,याची पालकांना खात्री वाटायला हवी. त्यामुळे सर्व शिक्षण संस्थांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालक शिक्षक संघ,माता पालक संघ, परिवहन समिती, सुरक्षा विषयक समिती स्थापन करून त्या कार्यन्वित करायला हव्यात. मात्र,बहुतांश शाळांमध्ये एकही समिती नसल्याचे दिसले.

ओरडतील म्हणून गप्प बसू नका

अत्याचाराच्या दररोज ऐकायला मिळणाऱ्या घटना धडकी भरवतात. मुलींच्या पालकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. मात्र, पालकांनी घाबरून न जाता अथवा मुलींवर अनावश्यक बंधने न लादता त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधण्याची गरज असते. बरेचदा पालक आपल्यालाच ओरडतील, या भीतीने मुली घरी कोणतीच गोष्ट सांगत नाहीत. ही ‘कम्युनिकेशन गॅप’ भरून निघायला हवी. मला दोन मुली आहेत. एक नववीत, तर दुसरी सहावीत शिकत आहे. लहानपणापासून आम्ही दोघांनी त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते ठेवले आहे. काहीही घडले तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हा विश्वास मुलांमध्ये निर्माण झाल्यास ती आपल्याशी खुलेपणाने बोलू शकतात. मुलांना लैैंगिक शिक्षण देण्याची सुरुवातही घरापासूनच व्हायला हवी.

- निकिता लिमये, पालक

कोरोनामुळे शाळास्तरावरील अनेक गोष्टी कार्यान्वित झाल्या नाहीत. गवत वाढल्याने व कचरा साचल्याने काही शाळा अस्वच्छ आहेत. ग्रंथालय व प्रयोगशाळांची दुरवस्था झाली असून, काही स्वच्छतागृहांची पडझड झाली आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी लवकर सर्व गोष्टी नीटनेटक्या कराव्यात. त्याचप्रमाणे पीटीए, माता पालक संघ, परिवहन समित्यांची स्थापना करावी.

- औदुंबर उकिरडे,शिक्षण उपसंचालक,पुणे विभाग

पुण्यातील एका नामांकित शाळेत मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. त्यावेळी शाळेची सुरक्षा यंत्रणा काय करीत होती? या अत्याचारी कृत्याचा आणि मुलांच्या सुरक्षिततेची काळजी न घेणाऱ्या शाळा प्रशासनाचा तीव्र निषेध. शाळेत सातत्याने घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- दिलीप सिंग विश्वकर्मा, अध्यक्ष, महापेरेंट्स

शाळेच्या आवारात अनोळखी व्यक्ती आल्यास संबंधित व्यक्तीला थांबवणे, वर्गात जाण्यापासून रोखणे ही शाळेतील कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. मुख्याध्यापकांच्या बैठकीमध्ये चर्चा करून अधिक जनजागृती करू.

- महेंद्र गणपुले,प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ

प्रत्येक शाळेमध्ये बाल संरक्षक समिती असावी आणि त्या माध्यमातून जाणीव जागृतीचे कार्यक्रम व्हावेत, अशा शासनाच्या सूचना आहेत. घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत विशेष न्यायालयात महिला मॅजिस्ट्रेटसमोर इन कॅमेरा पीडितेचा जबाब नोंदवून घेतला जातो. अशा घटनांमध्ये आरोपीला स्वत:ची बाजू सिद्ध करावी लागते. यामध्ये वकिलांनी पीडितेची उलटतपासणी घेऊ नये, याबाबत जागरुकता निर्माण होण्याची गरज आहे.

- नंदिता अंबिके, मुस्कान संस्था

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगMaharashtraमहाराष्ट्र