शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:15 IST

डॉ. बालाजी तांबे यांचा जन्म २८ जून १९४० रोजी झाला. त्यांनी आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ...

डॉ. बालाजी तांबे यांचा जन्म २८ जून १९४० रोजी झाला. त्यांनी आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. आयुर्वेदिक औषधोपचारांबाबत ते विविध माध्यमांतून प्रबोधन करत होते. नवी सुदृढ पिढी जन्माला यावी म्हणून त्यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले होते. त्यांच्या या पुस्तकाचे विविध भाषांमधून भाषांतर झाले. लोणावळ्याजवळ कार्ला येथील ‘आत्मसंतुलन व्हिलेज’मधून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली. त्यांनी आयुर्वेद आणि योगपोचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली.

लेखन

डॉ. बालाजी तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’सह ‘फॅमिली डॉक्टर’,‘स्वयंपाकघरातील दवाखाना’, ‘चक्र सुदर्शन’, ‘आयुर्वेदिक घरगुती उपचार’, ‘स्वाथ्याचे २१ मंत्र’, ‘जय देवा गजानना आता व्हा प्रसन्न’, ‘श्रीमन प्रसन्न’, ‘श्री गीतायोग शोध ब्रम्हविद्येचा’, ‘मंत्र आरोग्याचा’, ‘नाते वनस्पतींशी’ अशा वैैविध्यपूर्ण पुस्तकांचे लेखन केले. ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ येथून प्रकाशित होणाऱ्या ‘एको’ मासिकाचे ते संपादक होते.

पुरस्कार

तांबे यांना आयुर्वेदाच्या प्रसारासाठी रोटरी क्लब आॅफ पुणे अपटाऊन व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे २०१४ मध्ये ‘रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स’ अवॉर्ड आणि २०१७ मध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. ‘रेकगनिशन आॅफ एक्सलन्स इन हेल्थ केअर’साठी आयएमएचा पुरस्कार, आयुर्वेदाची जपणूक आणि विकासासाठीचा ‘प्रियदर्शनी पुरस्कार’, गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ‘सत्यशोधक समाजभूषण’ पुरस्कार, ‘संत गुलाबराव महाराज पुरस्कार’, इंडो यूएस कॉनक्लेव्हचा पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौैरवण्यात आले आहे.

--------------------

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचे पुनर्जीवन केले. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचे महत्व घराघरांत पोहोचवले. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गुण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ, आनंदी समाज निर्माण करण्याचं फार मोठे काम त्यांनी केले. बालाजी तांबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.