शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश पक्का? राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठ वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 16:10 IST

काँग्रेसमध्ये दिल्लीपासूनच अस्वस्थता आहे....

पुणे : ‘भाजप हा जनाधार असलेला पक्ष आहे. पक्षाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभर विश्वनेता म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन काही मंडळी येत असतील तर तो निर्णय पक्षाने घ्यायचा आहे. परंतु, काँग्रेसचे कुणी संपर्कात आहेत असे मानण्याचे कारण नाही. कारण ज्या पक्षाला नेतृत्वच नाही अशा पक्षातील नेते सक्षम नेतृत्व असलेल्या पक्षाकडे येण्याचा कल राहीलच,’ असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये येण्याच्या चर्चेबाबत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. त्यामुळे भविष्यातील वाटचालींकरिता लोक मार्ग शोधतीलच.’

ईडीच्या फोननंतर लोक भाजपमध्ये जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर ते म्हणाले, ‘ईडीचे फोन आले असते तर पटोले यांनी भाजप सोडला नसता. हा सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसमध्ये दिल्लीपासूनच अस्वस्थता आहे. त्यामुळे आता काँग्रेसला कुणी वाचवू शकेल असे वाटत नाही.’

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAshok Chavanअशोक चव्हाणNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेस