शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एकट्याला ठेवून मोबाईल काढून घेतल्यास काय त्रास होतो बघा - अमिताभ गुप्ता

By नम्रता फडणीस | Updated: July 18, 2024 18:07 IST

पोलीस आयुक्त असताना गुन्हेगारांना पकडून कारागृहात टाकले आणि त्यानंतर कारागृह महानिरीक्षक झाल्यावर कैद्यांच्या समस्याच सोडविण्याचे काम केले

पुणे : कैद्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधांवर अनेक जण फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या सुविधा देण्यात येत असल्याची टीका करत आहेत. पण मला काहीच फरक पडत नाही. एकदा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एकट्याला ठेवून मोबाईल काढून घेतल्यास काय त्रास होतो हे बघा. मग फाईव्ह स्टार हॉटेल आणि कारागृह यातील फरक समजेल अशा शब्दांत मावळते अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी टीकाकारांना सुनावले.        पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी  (दि. १८)  अमिताभ गुप्ता यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. पुण्यातून पोलीस आयुक्त ते कारागृह महानिरीक्षक असा प्रवास गुप्ता यांनी उलगडला. पोलीस आयुक्त असताना गुन्हेगारांना पकडून कारागृहात टाकले आणि त्यानंतर कारागृह महानिरीक्षक झाल्यावर कैद्यांच्या समस्याच सोडविण्याचे काम केले. आयुक्तांचा रोल नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा होता आणि कारागृह महानिरीक्षक झाल्यानंतर कैद्यांना सगळं काही मिळत आहे की नाही हे पाहण्याचे काम केले, अशी डबल ड्युटी निभावली असल्याची मिश्किल टिप्पणी अमिताभ गुप्ता यांनी केली.    ते म्हणाले,  कारागृह महानिरीक्षक म्हणून मला भरपूर शिकायला मिळाले. ज्या काही गोष्टीबाबत कारागृहावर  टीका  झाली. त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या.. मानवी अधिकाराच्या अनुषंगाने कैद्यांना  जे काही देता येत होते ते त्यांना  दिले आहे. कारागृहातील अनेक चुकीच्या गोष्टी बदलल्या. अनेक कारागृहात मोबाईल सापडत होते. त्यासाठी राज्यातील ३० कारागृहात फोनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी थांबल्या आहेत. यानंतर अनेक कारागृहात सीसीटीव्ही बसविल्याने सुरक्षितता आणि पारदर्शकता आली. कैद्यांच्या लहान लहान मागण्या होत्या. गाडी, स्वेटर, गरम पाणी, वॉटर कुलर, वाशिंग मशीन या गोष्टी उपलब्ध करून दिल्या.  कारागृहात भजन स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा घेतल्या. पूर्ण समर्पण भावनेतून काम केले. ज्याच्या कामाचे त्याला श्रेय दिले. कैद्यांचा दृष्टीकोन बदलला. नवीन कारागृहासाठी पालघर, नगर, येरवडा येथील कामाला गती मिळाली. पुणे पोलिस आयुक्त पद सोडल्यानंतर मानसिकरित्या स्थिरस्थावर व्हायला जवळपास  एक महिना लागला. निवृत्ती नंतर पुण्यातच वास्तव्यास राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. .

सोशल मीडियाचा कामात सकारात्मक वापर 

पुण्यात काम करत असतांना सोशल मीडियाचा भरपूर वापर केला. सोशल मीडियाबरोबरच इतर माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. त्यामुळे त्यांना नेमके काय हवे, त्यांची मागणी काय आहे समजले आणि त्या अनुषंगाने काम केले. गुगलचा वापर करून तीन ते चार भाषेमध्ये प्रेस नोट काढल्या. यामुळे मराठी, हिंदी बरोबर इतर भाषिक माध्यमांनी दखल घेतली असल्याचे गुप्ता म्हणाले. 

कारागृह नियमावली ब्रिटिश काळातील आहे.  ते नियम बदल्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टीसाठी समिती स्थापन केली जाते. काळानुसार या बदल करायला हवा. खुल्या कारागृहाबाबद्दल स्पष्टता गरजेची आहे. एक जण काही तरी चुकीचे करतो त्याच्या परिणाम अनेकांना भोगावा लागतो. यात बदल करावा लागणार आहे. ८० टक्के कैद्यांकडून पहिल्यांदा गुन्हा होतो. त्या दिवशी त्यांच्याकडून चूक होते. त्यांना चांगला वकील मिळत नसल्याने त्यांना अनेक दिवस कारागृहात राहावं लागत असल्याकडेही  गुप्ता यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीyerwada jailयेरवडा जेलSocialसामाजिक