शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:25 IST

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. "अपमानाचे मंत्रालय" स्थापन करावे, असा टोला गांधी यांनी लगावला. छठपूजेवरील राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी पंतप्रधान मोदींवर प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधानांनी अपमानाचे मंत्रालय स्थापन करावे कारण ते सतत विरोधी नेत्यांवर देशाचा आणि बिहारचा अपमान केल्याचा आरोप करतात, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.

काही दिवसांपूर्वी पीएम मोदी यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला छठपूजेचा अपमान अपमान असे म्हटले होते. या टीकेला आता प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका रॅलीदरम्यान ही टीका केली. राहुल गांधी यांनी रेखा सरकारने दिल्लीत छठपूजेसाठी बांधलेल्या घाटाचा उल्लेख केला होता.

राहुल गांधींची टीका काय होती?

राहुल गांधी म्हणाले होते, "त्यांनी एक नाटक केले आणि भारताबद्दलचे सत्य उघड केले. यमुनेचे पाणी घाणेरडे आहे. ते प्यायल्याने तुम्ही आजारी पडाल किंवा मराल. कोणीही त्यात जाऊ शकत नाही. पाणी इतके घाणेरडे आहे की जर तुम्ही त्यात पाऊल ठेवले तर तुम्ही आजारी पडाल किंवा संसर्ग होईल. पण पंतप्रधान मोदींनी एक नाटक केले."

राहुल गांधी म्हणाले, "त्यांनी तिथे एक लहान तलाव बांधला. निवडणुकीच्या वेळी ते तुम्हाला काहीही दाखवतील. मागून एक पाईप बसवण्यात आला होता. त्यातून स्वच्छ पाणीपुरवठा केला जात होता. पण समस्या अशी होती की कोणीतरी पाईपचा फोटो काढला." पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या हल्ल्याला छठचा अपमान असल्याचे म्हटले होते.

प्रियांका गांधी यांनी निशाणा साधला

पंतप्रधान मोदींनी विचारले, "मतांसाठी छठीमैय्याचा अपमान करणाऱ्यांना बिहार आणि भारत माफ करेल का? छठच्या वेळी उपवास करणाऱ्या माता आणि भगिनी अशा अपमान सहन करतील का आणि त्यांना शिक्षा करणार नाहीत का?" प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांच्या उत्तरावर टीका केली.

"पंतप्रधान अनावश्यक मुद्द्यांवर बोलतात, परंतु बिहारमधील एनडीए सरकारच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराबद्दल एकही शब्द बोलत नाहीत, अशी टीका प्रियांका गांधीनी केली. त्यांनी बिहार सरकारवर दिल्लीवरून रिमोट कंट्रोल असल्याचा आरोपही केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Gandhi Attacks PM Modi, Suggests Ministry of Humiliation

Web Summary : Priyanka Gandhi criticized PM Modi, suggesting a 'Ministry of Humiliation' due to his constant accusations against opposition leaders. This followed Modi's condemnation of Rahul Gandhi's remarks about Chhath Puja, which he deemed disrespectful. Gandhi accused the NDA government in Bihar of corruption and misgovernance, controlled remotely from Delhi.
टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी