शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक

By admin | Updated: January 16, 2015 03:06 IST

जर येथील शेतक-याना भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नसेल तर त्यांच्या जमिनीवरील धरणग्रस्तांसाठी शेरे काढण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. असे असताना याबाबत

राहू : जर येथील शेतक-याना भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नसेल तर त्यांच्या जमिनीवरील धरणग्रस्तांसाठी शेरे काढण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. असे असताना याबाबत काहीही कार्यवाही होत नाही. तसेच या जमिनीचे वाटप गुंंजवणी धरग्रस्तांसाठी होत असल्याने राहू बेट परिसरातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. येथे ताबा घेण्यासाठी धरणग्रस्त आल्यास त्यांना आमच्या रोषाला सामोरे जावे लागले असा इशारा त्यांनी दिला आहे.राहूबेट (दौंड) परिसरातील ९ गावांतील सुमारे १८ हजार एकर क्षेत्रावर ‘भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव क्षेत्र’ असा, तर काही ठिकाणी सात-बाऱ्याच्या मालकी हक्कात जिल्हाधिकारी नाव लागले आहे. या जमिनी मूळ मालकांना मिळाव्यात, यासाठी दौंड तालुका भामा-आसखेड संपादित क्षेत्र शेतकरी कृती समिती व शिरूर, हवेली शेतकरी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी आंदोलने , बैठका झाल्या. शासनाने भामा-आसखेड धरणाचे पाणी दौंड, शिरूर, हवेली या तालुक्यांतील शेतकऱ्यांना जाणार नसेल व या भागात कालवा होत नसेल, तर या शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवणे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे व त्यांच्यावर अन्यायकारक आहे, असा निर्णय घेऊन त्या जमिनी मूळ मालकांना देण्याबाबत अध्यादेश (आरपीए-३४१२/प्र.क्र.१0१/र-४ महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई-३२, दि. १/९/२0१४ ) काढला. परंतु, याबाबत अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नाही. या अध्यादेशाची अंमलबजावणी कधी होणार, याच्या प्रतीक्षेत बाधित शेतकरी आहेत. या सर्व प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल्या होत्या. नवीन सरकार सत्तेत येऊन तीन महिने पूर्ण झाले; परंतु त्याबाबत ठोस पाऊल उचलेले दिसत नाही. त्यानंतर हिवाळी अधिवेशनही पार पडले. काहीही निर्णय घेतला नसल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते आता आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत.आमचे क्षेत्र लाभक्षेत्रात येत नाही. तसेच येथे कालवाही केला नाही. त्यामुळे आमच्या जमीनीवर धरणग्रस्तांसाठी राखीव असा शेरा टाकण्याचा अधिकार शासनास नाही. त्यात आरक्षीत जमीनीचे वाटप धरणग्रस्तांसाठी सुरू महसूल विभागाचे अधिकारी करीत आहेत. हे चुकीचे आहे. हे वाटप झाले असले तरी जे लोक ताब्यासाठी येतील त्या ठिकाणी रक्तपात झाला तरी आंम्ही मागे हटणार नाही असा इशारा पिलाण वाडी येथील शेतकरी महेंद्र झुरूंगे यांनी दिला आहे. (वार्ताहर)