शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात '' घशाला तहान, उदासिन प्रशासन''...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 1:13 PM

पाणी नसल्याने अनेक ठिकाणी लोकांना काम धंदा सोडून पाण्याचा टँकर कधी येणार याची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत असल्याचे चित्र आहे..

पळसदेव : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना प्रशासन मात्र उदासीन आहे. अनेक ठिकाणी स्वत: ग्रामपंचायत ने पाणी टँकर सुरू केले आहेत. लोकांची तहान भागविण्यासाठी अनेक ग्रामपंचायती दररोज हजारो रुपये खर्च करत आहेत. मात्र प्रस्ताव पाठवून सुध्दा प्रशासनाने टँकर सुरू केलेले नाहीत. त्यामुळे लोकांना आहे तहान. ...अन् प्रशासन उदासिन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पाणी नसल्याने अनेक ठिकाणी लोकांना काम धंदा सोडून पाण्याचा टँकर कधी येणार याची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाण्याचा टँकर आला की, पाणी भरण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. यावरून पाण्याची टंचाई व दुष्काळाची दाहकता काय आहे याचा प्रत्यय येतो. एवढी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असताना शासनाचा एकही अधिकारी फिरकताना दिसत नाही. यावरून प्रशासन किती तत्पर याचा प्रत्यय येतो. शासनाचे अधिकारी कागदोपत्री काम करतात. मात्र लोकांना पाणीटंचाईचा त्रास होतो.  याबाबत भादलवाडी गावच्या सरपंच राणीताई कन्हेरकर यांनी सांगितले की, गेली दीड महिन्यांपासून आम्ही स्व: खर्चाने कंपनी मधून टँकरने पाणी आणत आहोत.  डाळज क्रमांक  २ चे सरपंच अ‍ॅड. प्रदीप जगताप यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आम्ही तहसीलदार मॅडम यांची भेट घेतली असता, त्यांनी सांगितले की, तुमचे गाव बॅकवॉटर पट्टयात आहे. तसेच दोन किलोमीटर हद्दीत विहीरी आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ............आम्ही येथील प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्या कडे पाठविला आहे. लवकरच टँकर सुरू होईल.-सोनाली मेटकरी, तहसिलदार, इंदापूर.

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीdroughtदुष्काळ