शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षांनंतर मोसे खोऱ्याला मिळाले रस्ते

By admin | Updated: July 2, 2017 02:06 IST

मुळशी तालुक्यामधील मोसे खोऱ्यातील अतिदुर्गम भागामधील असलेल्या मौजे तव गावच्या भोवताली असणाऱ्या झकनी, भोरदेव, गिरा व दूधवान

लोकमत न्यूज नेटवर्क
पिरंगुट : मुळशी तालुक्यामधील मोसे खोऱ्यातील अतिदुर्गम भागामधील असलेल्या मौजे तव गावच्या भोवताली असणाऱ्या झकनी, भोरदेव, गिरा व दूधवान या वस्त्यांना नुकतेच म्हणजे स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनंतर या गावात रस्ते मिळाले आहे. रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास होणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकासाचा वेग वाढला. बहुतांशी सर्व ठिकाणी गावोगावी व वाड्यावस्त्यांवरती मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. परंतु मुळशी तालुक्यातील मोसे खोऱ्यातील दुर्गम भागातील असलेल्या मौजे तव गाव व तेथील वाड्यावस्त्या या अनेक सुखसुविधा व मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या होत्या.
अतिशय दुर्गम भागात  वसलेल्या या गावात वीजही काही दिवसांपूर्वीच पोहचल्यानेही गावे प्रकाशमान झाली आहेत. या वरून हा भाग किती दुर्गम आणि सुविधांपासून वंचित असल्याची प्रचिती येते.
त्यातच भोवताली असणाऱ्या झकनी, भोरदेव, गिरा व दूधवन या वाड्या डोंगर भागामध्ये वसलेल्या असल्यामुळे आणि त्यांना वाहतुकीसाठी रस्ता नसल्यामुळे तेथील नागरिकांचे हाल होत होते. त्यात पावसाळ्यामध्ये तर येथील नागरिकांना खूपच मोठी कसरत करावी लागत होती. या वाड्यांवर रस्त्याअभावी दुचाकीसुद्धा जात नव्हती. परंतु आता नुकताच
जिल्हा परिषदेच्या फंडामधून या  चार वाड्यांना म्हणजेच स्वातंत्र्यानंतर जवळपास ७० वर्षांनंतर या
वाड्यांना रस्ते मिळाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जि.प.च्या माध्यमातून पूर्ण झालेल्या या रस्त्याचे काम जवळपास तीन महिने चालले. आता नुकतेच पावसाळ्याच्या तोंडावरती या रस्त्यांचे काम पूर्ण झालेले आहे. या ठिकाणी रस्ते व्हावेत व ते परिपूर्ण करण्यासाठी माजी जि. प. सदस्य व गटनेते शांताराम इंगवले,माजी सभापती महादेव कोंढरे, लालासाहेब पासलकर,वीरबाजी पासलकर प्रतिष्ठान अध्यक्ष राजाभाऊ पासलकर, तवचे सरपंच पल्लवी लालासो पासलकर, मुळशी बांधकाम विभागाचे अधिकारी के. डी. आरे, महेंद्र कोठारे, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.
या ठिकाणी रस्ते झाल्यामुळे  तव गावच्या सरपंच पल्लवी लालासो पासलकर यांचे येथील  नागरिकांकडून कौतुक करण्यात
येत आहे.

व्यवसायाला मिळणार चालना  या वाडीत धनगर समाजातील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. येथे दूध व्यवसाय हा चांगल्या प्रमाणात आहे. मात्र रस्त्यांअभावी तो व्यवसाय मोठा किंवा त्याची विक्री व्यवस्थित करता येत नव्हती. त्याचप्रमाणे या ठिकाणी भात, नाचणी, वरदी व बांबू हे पीक या भागात घेतले जाते. नवीन झालेल्या रस्त्यामुळे खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास होणार आहे.

हे रस्ते पानशेत ते तव असा असणाऱ्या मुख्य रस्त्यापासून झकनी दोन किलोमीटर,भोरदेव तीन किलोमीटर,गिरावस्ती दोन किलोमीटर, झकनी ते दूधवन चार किलोमीटर अशा अंतराचे रस्ते तयार करून ते सर्व रस्ते मुख्य पानशेत ते तव या रस्त्याला जोडलेले आहेत.