शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पारधी समाजासाठी ६६ घरकुले

By admin | Updated: April 15, 2017 03:47 IST

जिल्हा परिषदेला राज्य शासनाने पारधी समाज घरकुल योजनेअंतर्गत चालू वर्षामध्ये ६६ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड

पुणे : जिल्हा परिषदेला राज्य शासनाने पारधी समाज घरकुल योजनेअंतर्गत चालू वर्षामध्ये ६६ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड केली असून, लवकरच त्यांना निधी देणार आहे. यामुळे स्थलांतरित असणाऱ्या पारधी समाजातील कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. पारधी समाज हा विकासापासून कोसो दूर राहिला आहे. या समाजाचा विकास करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या घरकुल योजनेमधून लाभ मिळण्यासाठी लाभार्थी हा प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील असावा, पारधी समाजातील व दारिद्य्ररेषेखालील असावा, लाभार्थ्याकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, लाभार्थ्याला स्वत:चे पक्के घर नसावे, जिल्हा परिषद योजनेमधून अथवा इतर विभागांमार्फत घरकुल योजनेचा स्वत: अथवा पती/पत्नीच्या नावे लाभ घेतलेला नसावा आदी अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलासाठी दीड लाख रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. बॅँकांकडून लाभार्थ्याला कमी टक्के व्याजदराने ७० हजार रुपायांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. मनेरगाअतंर्गत काम करून १८ हजार मिळणार आहे, तसेच शौचालय बांधण्यासाठीही १२ हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. पारधी समाजातील व्यक्ती अनेकदा स्थलातंरित करतात; त्यामुळे त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतात. घरकुलासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी शासकीय कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. कागदपत्रांअभावी घरकुल योजनसाठी पात्र असूनही अनेकांना योजनाच्या लाभापासून वंचित राहावे लागते. या समाजात घरकुल आणि इतर योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेने तालुकानिहाय शिबिर घेण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)या घरकुलासाठी तीन टप्प्यांमध्ये निधी दिला जाणार आहे. कामाची गुणवत्ता कशी असावी, घरकुल कसे बांधावे, याबाबतही तालुकानिहाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करणर असल्याचे दौलत देसाई यांनी सांगितले. खेड, शिरूर, भोर, मावळ, जुन्नर, वेल्हा आणि बारामतीमध्ये शिबिर घेण्यात आले आहेत. इतर तालुक्यांमध्ये लवकरच शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या घरकुल योजनासाठी दौड ४४, इंदापूर ११, पुरंदर २ आणि शिरूरमधून पाच प्रस्ताव आले आहेत.