शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

Pune Rain: खडकवासल्यातून ४५ हजार क्युसेकने पाणी सोडणार; अग्निशमन दलाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 16:39 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडकवासला धरण ६५ टक्क्यांपर्यत खाली करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत

पुणे: पुण्यात सुरु असलेल्या पावसाने खडकवासला प्रकल्पातील धरणे भरू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कालपासून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. आता पुन्हा सायंकाळी ५ वाजता 35 हजार 2 क्युसेक विसर्ग वाढवून 45 हजार 705 क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडकवासला धरण ६५ टक्क्यांपर्यत खाली करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. त्यानुसार विसर्ग वाढवण्यास सुरुवात झाली आहे.   

मुठा नदीपात्रात सुरु असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सिंहगड रोड परिसरात एकता नगरी, सरिता नगरी, डेक्कन नदीपाञ, एरंडवणा, खिलारेवाडी, दत्तवाडी, विश्रांतवाडी या भागात उपाययोजना करण्यात येत आहेत.  सद्यस्थितीत एकता नगरी येथून २५ तर निंबोज नगर येथून २० नागरिक अशा एकुण ४५ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तर एक श्वान व एक मांजर अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितस्थळी हलविले आहे. येरवडा - शांतीनगर व आदर्श नगर येथे पाण्याची पातळी वाढली असून अग्निशमन दलाकडून सुमारे शंभर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 

दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात आज जोराचा पाऊस होत असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसDamधरणNatureनिसर्गenvironmentपर्यावरणSocialसामाजिकWaterपाणीfire brigade puneपुणे अग्निशामक दल