शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

७ महिन्यांत ३०६ विद्युत रोहित्रांची चोरी

By admin | Updated: January 11, 2015 23:59 IST

प्रामुख्याने शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने उभारलेल्या रोहित्र संचांपैकी गेल्या ७ महिन्यांत पुणे जिल्ह्यात तब्बल ३०६ रोहित्रांची चोरी झाली

प्रज्ञा सिंग-केळकर, पुणेप्रामुख्याने शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने उभारलेल्या रोहित्र संचांपैकी गेल्या ७ महिन्यांत पुणे जिल्ह्यात तब्बल ३०६ रोहित्रांची चोरी झाली असून, त्याचा मोठा फटका महावितरणला आर्थिकदृष्ट्या बसला आहेच़ त्याचबरोबरच नवीन रोहित्र बसविण्यास अनेक दिवस वाट पाहावी लागल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसत आहे़ महावितरणच्या पुणे परिमंडळात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांबरोबरच मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांचा समावेश होतो़ या तालुक्यांमध्ये गेल्या ७ महिन्यांत ८६ रोहित्र चोरीच्या घटना घडल्या़ सर्वाधिक चोरीचे प्रमाण बारामती विभागात आहे़ या विभागात शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि भोर तालुक्यांचा समावेश आहे़ एप्रिल ते डिसेंबर २०१४अखेर २२० रोहित्र चोरीच्या घटना घडल्या आहेत़ गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शहरे किंवा वस्त्यांच्या तुलनेत निर्जनस्थळी असलेल्या शेतांमध्ये रोहित्र चोरीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी सतर्क राहणे, पाळत ठेवणे आणि चोऱ्या होऊ नयेत म्हणून पुढाकार घेणे गरजेचे आहे. रोहित्र चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे तसेच महावितरणचे नुकसान होते व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. रोहित्र चोरीस गेल्यानंतर ग्राहकांना मिळणारी वीजसेवा प्रभावित होते. रोहित्र सार्वजनिक ठिकाणी व निर्जनस्थळी असल्याने ते सांभाळण्यासाठी महावितरणकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सावध राहून पोलीस यंत्रणा व महावितरणला माहिती दिल्यास रोहित्र चोरी टाळणे शक्य आहे. शेतकरी बांधवांच्या कृषी पंपांना ज्या रोहित्रावरून वीजपुरवठा होतो, ते रोहित्र सांभाळण्याची जबाबदारी शेतकरी ग्राहकांवरच टाकली आहे़ रोहित्र चोरीच्या घटना रोखण्यासाठी महावितरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत़ रोहित्रांना वेल्ंिडग करून ते वीज खांबांना (डबल पोल) जोडण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांना गस्त घालण्यासाठी महावितरणकडून वाहन व कर्मचारी वेळोवेळी मदतीला देण्यात आलेले आहेत. वारंवार रोहित्र चोरीस जात असल्याने त्या ठिकाणी नवीन रोहित्र बदलून देण्याबाबतचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. चोरीस गेलेले रोहित्र यापुढे बदलून देण्यात येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता आहे.