गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४वारकऱ्यांचा मृत्यू;सहायता निधीतून वारसांना दमडीही नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:54 IST2025-06-18T16:50:31+5:302025-06-18T16:54:49+5:30
गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४ वारकऱ्यांचा झाला मृत्यू, शासनाचेही दुर्लक्ष

गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४वारकऱ्यांचा मृत्यू;सहायता निधीतून वारसांना दमडीही नाही
नीरा : आषाढी वारी काळात गेल्या दोन वर्षात संतांच्या पालखी सोहळ्यात चालणाऱ्या सुमारे २४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला; परंतु शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून एक रुपयाही मयत वारकऱ्यांच्या वारसाच्या खात्यात जमा झाला नाही.
सन २०२३ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी काळात संतांच्या पालख्यांसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली होती.
सन २०२३ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी काळात संतांच्या पालख्यांसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. गेल्या दोन वर्षात वारीमध्ये जवळपास २४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या मृत वारकऱ्यांची नावे या पालखी सोहळाप्रमुखांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे दिली होती; परंतु एक रुपयाही वारसाला मिळाला नाही.
वारकऱ्यांसाठी तीन लाख रेनकोटचे होणार वाटप
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी रेनकोट वाटप केले जाणार आहे. माउलींच्या सोहळ्यातील दिंड्यांसाठी सुमारे तीन लाख रेनकोट वाटपासाठी दिंडी प्रमुखांकडे दिले जाणार आहेत.
माउलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या दिवसापर्यंत आळंदीत वारकऱ्यांसाठी रेनकोटचे वाटप केले जाणार असून,उर्वरित शिल्लक रेनकोटचे वाटप पालखी मार्गावर सासवड,जेजुरी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी केले जाणार आहे.भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मागील वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही वारकऱ्यांसाठी रेनकोट दिले आहेत.