शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘आयुष्यमान’साठी बाराशेचा हप्ता, जाहिरातीमध्ये उल्लेखच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 02:13 IST

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ मिळण्यासाठी गरिबांना वर्षाला १२०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या केलेल्या जाहिरातीमध्ये याचा कुठेही उल्लेख केलेला नाही.

पुणे -  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ मिळण्यासाठी गरिबांना वर्षाला १२०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या केलेल्या जाहिरातीमध्ये याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे संपूर्ण उपचार मोफत मिळणार असाच समज गरिबांचा झालेला आहे. परंतु, ही विमा योजना असून, त्यासाठी वर्षाला प्रिमियम भरावा लागणार आहे. त्यामुळे गरीब दरवर्षी १२०० रुपये भरणार का? हा सवाल उपस्थित झाला आहे.केंद्र सरकारनेभारतीय नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी या योजनेची घोषणा १ फेब्रुवारी २०१८ रोजी केली होती. त्यानंतर २५ सप्टेंबर २०१८ रोजी रांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा प्रारंभ केला.केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशातील ५० लाख जनतेला याचा लाभ मिळणार आहे. परंतु, या योजनेतील एक बाब मात्र कोणत्याही जाहिरातीमध्ये स्पष्ट केलेली नाही. ती म्हणजे या मोफत उपचारासाठी गरिबांना किती पैसे भरावे लागणार आहेत. या योजनेसाठी वर्षाला सुमारे १२०० रुपये हप्ता भरणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ गरिबांना मिळणार आहे.येथे करा नोंदणीनॅशनल हेल्थ एजन्सीद्वारे देशभरात १४ हजार आरोग्य मित्रांची भरती केली जाणार आहे. हे आरोग्य मित्र रूग्णांना मदत करतील. नॅशनल हेल्थ एजन्सीच्या ेी१ं.स्रे्नं८.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव आहे की नाही ते तपासता येईल. तसेच १४५५५ यावर संपर्क करता येईल.योजनेतील महत्त्वाचे मुद्देयोजनेचा उद्देश देशातील नागरिकांना मूलभूत आरोग्यविषयक सुविधा देणे हा आहे.देशातील सुमारे १० कोटी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. एकदा ही विमा पॉलिसी घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ मिळेल. सुमारे ५० कोटी नागरिक यामध्ये समाविष्ट होऊ शकतात.ही पहिलीच अशी योजना आहे की, ज्याद्वारे संपूर्ण कुटुंबाला आरोग्याचा लाभ होईल. यामध्ये कुटुंबातील ५ व्यक्तींचा समावेश असेल.या योजनेतून एका कुटुंबाला ५ लाख रूपयांपर्यंत आरोग्याची सुविधा मिळणार आहे.‘सीएससी’मध्ये नोंदणी प्रक्रियादेशातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी देशभरात सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) ची स्थापना होणार आहे. त्या ठिकाणी नागरिकांना संपूर्ण माहिती द्यावी लागेल. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व राज्यांमध्ये काही निवडक रूग्णालयांची यादी आणि कॉमन सर्व्हिस सेंटरची घोषणा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी देशात सुमारे १.५ लाख कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे १२०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे.कोणत्या आजारांवर उपचारसरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार मिळणार आहेत. कॅन्सर सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हार्ट बायपास सर्जरी, न्यूरो सर्जरी, दातांची सर्जरी, डोळ्यांची सर्जरी, एमआरआय, सीटी स्कॅन आदी सुविधा यात मिळणार आहेत.योजनेसाठी पात्रताया योजनेत तेच लोक लाभ घेऊ शकतात जे २०११ च्या दारिद्र्यरेषेखालील यादीत आहेत. जर एखाद्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्याकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच त्याचा आधार कार्ड लिंक झालेला असले पाहिजे. त्यासोबतच बॅँक खाते, कुटुंबाचे प्रमाणपत्र, प्राप्तीकर पत्र, वयाचा दाखला आदी माहिती देणे आवश्यक आहे.केंद्राकडून ६० टक्के, राज्याकडून ४० टक्के निधीयोजनेसाठी केंद्र सरकार ६० टक्के आणि राज्य सरकार ४० टक्के निधी देणार आहे. प्रथम नोंदणी केलेल्या व्यक्तींना केंद्राकडून ५० टक्के निधी दिला जाईल. त्यासाठी केद्र सरकारने ५ हजार ते ६ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे.पुणे जिल्ह्यात साडेचार लाख कुटुंबांना लाभपुणे जिल्ह्यात ४ लाख ५७ हजार २८ कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल. त्यात शहरातील २ लाख ७७ हजार ६३३, तर ग्रामीण भागातील १ लाख ७९ हजार ३९५ कुटुंबांचा समावेश आहे. या कुटुंबीयांना आता नोंदणी करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी १२०० रूपये हप्ता भरला, तरच उपचार मिळणार आहेत.आयुर्वेदचा समावेश का नाही?आयुर्वेद हा आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. त्यामुळे आयुर्वेदचा समावेश आरोग्यविषयक योजनेत असला पाहिजे. सरकारने आयुर्वेदचा उपयोग योजनांमध्ये करावा, ही आमची मागणी आहे. सरकारी योजनांमध्ये आयुर्वेदचा समावेश केल्यास सामान्य नागरिकांना त्याचा खूप फायदा होईल.डॉ. सुहास परचुरे, माजी अध्यक्ष,नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)देशातील १७ टक्केच लोकांचा आरोग्यावर खर्चनॅशनल सॅँपल सर्व्हे आॅर्गनायजेशनच्या सर्व्हेनुसार देशातील ८५.९ टक्के ग्रामीण भागातील आणि ८२ टक्के शहरी भागातील लोकांनी आरोग्यविषयक विमा काढलेला नाही. तसेच देशातील सुमारे १७ टक्के लोक आपल्या कमाईतील १० टक्केच पैसे आरोग्यावर खर्च करते, हे दिसून आले आहे. त्यामुळे ही योजना सुरू केली आहे.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतHealthआरोग्यIndiaभारतGovernmentसरकार