शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

१२०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

By admin | Updated: March 5, 2015 00:25 IST

अस्वच्छता करणा-या तसेच प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणा-या तब्बल साडेचार हजार उपद्रवी नागरिकांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : गेल्या दोन महिन्यात शहरात कचरा समस्या निर्माण झाली असतानाही; महापालिकेस सहकार्य न करता, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या तसेच प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणा-या तब्बल साडेचार हजार उपद्रवी नागरिकांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जव़ळपास १२०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून तब्बल १० लाख २६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील कचरा उरूळी देवाची येथील डेपोवर आणण्यास फुरसुंगी आणि उरूळी गावाच्या ग्रामस्थांनी घातलेली बंदी या आठवडयात मागे घेतली आहे. मात्र, त्या पूर्वी संपूर्ण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शहरात निर्माण होणारा कचरा महापालिकेकडून शहरातच जिरविण्यात येत होता. यावेळी नागरिकांना शिस्त लागावी तसेच कचरा समस्या गंभीर होण्यास कारणीभूत असलेल्या ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अस्वच्छता करणा-या तसेच बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या विक्रेत्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)प्रमुख क्षेत्रीय कार्यालयांना मिळेना वेळ शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या टिळक रस्ता आणि कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत मोठया प्रमाणात गेल्या दोन महिन्यात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. तर कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात सर्वाधिक व्यावासायिक अस्थापना असल्याने प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर राजरोसपणे होतो. त्यामुळे या क्षेत्रीय कार्यालयांकडून ही कारवाई होणे अपेक्षीत असताना, महापालिकेने शहरात केलेल्या या दोन महिन्यांच्या कारवाईत या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांनी केलेल्या कारवाईचा कोणताही अहवाल घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे नाही. त्यामुळे या ज्या ठिकाणी गरज आहे. त्याच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे काम योग्य पध्दतीने होत नसल्याचे चित्र आहे.. या कारवाई नंतर संबधितांकडून दंड वसूली करण्यात आली असून १३०० जणांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.