शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 07:52 IST

Nitin Gadkari: केंद्र सरकारमधील मराठी मंत्री महाराष्ट्राचे अ‍ॅम्बेसिडर आहेत. देशाच्या विकासाचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम केंद्रातील मराठी मंत्री करतील, असे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील मराठी मंत्री महाराष्ट्राचे अ‍ॅम्बेसिडर आहेत. देशाच्या विकासाचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम केंद्रातील मराठी मंत्री करतील, असे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नवीन महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढचे पाऊल आणि दिल्ली अधिकारी या संस्थेतर्फे केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांचा  नितीन गडकरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. गडकरी यांच्याहस्ते नारायण राणे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी म्हणाले, “मी अपघाताने दिल्लीत आलो असलो तरी, नवीन महाराष्ट्र सदनाच्या वास्तुकरिता जमीन मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न होते. आज इथे छगन भुजबळ यांनी भव्य वास्तू उभारली आणि याच वास्तूत नवीन केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार होतो आहे, याचा आनंद होतो.”  डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे दिल्लीत महाराष्ट्रातील लोकांची काळजी घेतात. त्यांच्यामुळेच दिल्लीत मराठी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आहेत. मराठी मुले उच्च पदावर यावीत, ही त्यांची तळमळ मी अनेक वर्षांपासून पाहतोय.  पुरामुळे महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. राज्याची अलीकडे वाताहत होताना दिसते. विदेशात असलेल्या मराठी बांधवांनी महाराष्ट्राला मदत करावी, असे आवाहन यावेळी नारायण राणे यांनी केले. महाराष्ट्राचे प्रश्न मी प्राधान्याने सोडवेन, रोजगार वाढीसाठीही माझा प्रयत्न असेल, असे त्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.  डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांचीही भाषणे झाली. 

मंत्र्यांनी पुढाकार घ्यावाज्ञानेश्वर मुळे यांनी प्रास्ताविकात, युपीएससी करण्यासाठी जे मराठी विद्यार्थी दिल्लीत येतात, त्यांच्या निवासासाठी वसतिगृह आणि मोफत ग्रंथालय सुरू करण्याचा मानस व्यक्त करून, यासाठी सर्व मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी विनंती केली. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMaharashtraमहाराष्ट्र