शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

Video: बिहारचा नेता कोण? काँग्रेस आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी; चोर म्हटल्याने निमित्त झाले

By हेमंत बावकर | Updated: November 13, 2020 17:33 IST

Bihar Assembly Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीशकुमारांना मुख्यमंत्री पद देण्यावरून वक्तव्ये करत आहेत. तर नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे पाहून एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरळा खाली बसत नाही तोच अवघ्या 19 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्ये नेता कोण बनणार यावरून तुंबळ हाणामारी पहायला मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे आमदारांमध्येच हा राडा झाला आहे. 


बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीशकुमारांना मुख्यमंत्री पद देण्यावरून वक्तव्ये करत आहेत. तर नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे पाहून एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटले आहे. तर दुसरीकडे राजदने एनडीएतील मित्रपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोर लावला आहे. अशातच काँग्रेसनेही आज नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली होती. 


काँग्रेस आमदारांच्या या बैठकीत शुक्रवारी मोठा राडा झाला. बैठकीमध्ये आमदार विजय शंकर दुबे यांना चोर म्हटल्याने मोठा गोंधळ उडाला होता. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सदाकत आश्रममध्ये या नव्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी दोन गटांत मोठा राडा झाला आणि शिवीगाळही करण्य़ात आली. 


महाराजगंजहून आमदार विजय शंकर दुबे आणि विक्रमचे आमदार सिद्धार्थ यांच्यामध्ये काँग्रेसच्या गटनेता कोण होणार यावरून बाचाबाची झाली. यावेळी सिद्धार्थ गटाच्या आमदारांनी दुबेंना चोर म्हटले. यामुळे संतापलेल्या झालेल्या दुबे गटाने थेट हाणामारीला सुरुवात केली. दोन्ही गट एकमेकांना भिडले. 




यानंतर नेत्यांमध्ये राडा झाल्याचे कळताच बाहेर उभे असलेल्या कार्यकर्त्यांनीही बैठकीकडे धाव घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 


"आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं; पुन्हा मतमोजणी करा", तेजस्वी यादवांची मागणी
 बिहारनिवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले आहे. तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवलं गेलं आहे असं देखील तेजस्वी यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत अशी मागणी केली आहे. 

"जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. 2015 मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला" असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मतं मोजणं अत्यंत आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले. या बरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमार