शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाचं सरकार; ७० वर्षाचा इतिहास बनला चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 11:09 IST

गंगोत्री विधानसभा मतदारसंघातून ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो त्याच पक्षाचं सरकार राज्यात स्थापन होतं. नेमकं यामागचा इतिहास काय आहे?

ठळक मुद्देगंगोत्री विधानसभा मतदारसंघात १९५२ पासून आजतागायत ज्या पक्षाचा उमेदवार निवडून आला त्याचा पक्ष सत्तेत आला आहेउत्तराखंड राज्याची स्थापना होण्यापूर्वी हा मतदारसंघ उत्तरकाशी म्हणून ओळखला जायचा. नव्या राज्यात उत्तरकाशीचे ३ मतदारसंघ तयार झाले. पुरोला, गंगोत्री आणि यमुनोत्री विधानसभा मतदारसंघ बनले.

उत्तराखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी राहिले आहेत. या पहाडी राज्यात कुणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सरकार कुणाचंही येवो पण सध्या एक मुद्दा येथील राज्यात चांगलाच गाजताना दिसत आहे. हा योगायोग म्हणा अथवा चमत्कार परंतु देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत ही घटना घडत आहे. ही चर्चा आहे गंगोत्री विधानसभा मतदारसंघाची..! (Gangotri Assembly Seat)

गंगोत्री विधानसभा मतदारसंघातून ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो त्याच पक्षाचं सरकार राज्यात स्थापन होतं. नेमकं यामागचा इतिहास काय आहे? कधीपासून हा राजकीय चमत्कार घडत आहे? हे जाणून घेऊया. गंगोत्री विधानसभा मतदारसंघात १९५२ पासून आजतागायत ज्या पक्षाचा उमेदवार निवडून आला त्याचा पक्ष सत्तेत आला आहे. गंगोत्री विधानसभा मतदारसंघ २००० मध्ये निर्माण झाला. उत्तराखंड राज्याची स्थापना होण्यापूर्वी हा मतदारसंघ उत्तरकाशी म्हणून ओळखला जायचा. २००० मध्ये उत्तराखंड उत्तरप्रदेशमधून विभाजन होऊन बनला. नव्या राज्यात उत्तरकाशीचे ३ मतदारसंघ तयार झाले. पुरोला, गंगोत्री आणि यमुनोत्री विधानसभा मतदारसंघ बनले. (Uttarakhand Assembly Election 2022)

उत्तरप्रदेशात झालेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून चमत्कार

१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून उत्तरप्रदेशात १९५२ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली गेली. तेव्हा गंगोत्री उत्तरकाशी विधानसभा मतदारसंघाचा भाग होता. त्यावेळी या जागेवरून जयेंद्र सिंह बिष्ट अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले. तेव्हा उत्तर प्रदेशात पं. गोविंद बल्लभ पंत यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार बनलं.

१९५७ ते १९७४ काँग्रेस आमदार, काँग्रेस सरकार

१९५७ मध्ये विधानसभा निवडणुकीत जयेंद्र बिनविरोध निवडून आले. त्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. परंतु १९५८ मध्ये आमदार जयेंद्र यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे रामचंद्र उनियाल आमदार बनले. त्यानंतर १९६२, १९६७, १९६९, १९७४ या मतदारसंघात काँग्रेस आमदार जिंकले आणि राज्यात काँग्रेसचं सरकार आलं. तेव्हापासून हे चक्र सुरूच झालं.

१९७७ मध्ये पहिल्यांदाच बनलं जनता पार्टीचं सरकार

१९७७ मध्ये जनता पार्टीचे उमेदवार बर्फियालाल निवडणुकीत आमदार बनले तेव्हा उत्तर प्रदेशात जनता पार्टीचं सरकार बनलं. त्यानंतर १९८० आणि १९८५ मध्ये उत्तरकाशी मतदारसंघात काँग्रेस आमदार जिंकला तेव्हा राज्यात काँग्रेस सत्तेत आली. १९८९, १९९१, १९९६ आणि २००० पर्यंत या मतदारसंघाचा राजकीय चमत्कार असाच कायम होता.

उत्तराखंड राज्याच्या स्थापनेनंतरही प्रथा मोडली नाही

९ नोव्हेंबर २००० मध्ये उत्तराखंड राज्याची स्थापना झाली. तेव्हा उत्तरकाशी मतदारसंघाचे तीन भाग झाले. गंगोत्री मतदारसंघ त्यातलाच एक. २००२ मध्ये पहिल्या विधानसभा निवडणुकीत गंगोत्रीमधून काँग्रेसचे आमदार विजयपाल सजवाण निवडणुकीत जिंकले तेव्हा राज्यात काँग्रेसची सत्ता आली. २००७ मध्ये भाजपाचे गोपाळ सिंह निवडून आले तेव्हा भाजपा सत्तेत आली. त्यानंतर २०१२ मध्ये काँग्रेसचे विजयपाल सजवाण पुन्हा निवडून आले. तेव्हा विजय बहुगुणा यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेसची सत्ता आली.

२०२२ मध्ये प्रथा कायम राहणार की ७० वर्षाचा इतिहास बदलणार

२०१७ मध्ये गंगोत्री मतदारसंघातून भाजपाचे गोपाळ सिंह रावत आमदार बनले आणि राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता आली. परंतु २०२१ मध्ये आजारपणामुळे आमदार गोपाळ सिंह रावत यांचे निधन झाले आहे. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. आता २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे गंगोत्री मतदारसंघात कुठल्या पक्षाचा आमदार निवडून येणार आणि कुणाची सत्ता स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक