शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

...तर कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 03:24 IST

शिंदे यांना काँग्रेस पक्षाने संधी द्यायला हवी होती. तथापि,लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच काही पद देण्याची पद्धत त्या पक्षात नाही.

मुंबई : महाराष्ट्रातील सरकार गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला कोसळणार असा दावा भाजपचे नेते करीत असले तरी राजकीय भूकंपाचा दावा करणाऱ्यांचा शिमगा आता संपलेला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी महाविकास आघाडीला धोका असल्याची शक्यता फेटाळून लावली.

राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे, ही राष्ट्रवादीची भूमिका असून कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एसआयटी चौकशीच्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला योग्य प्रकारे अर्थसहाय्य दिले जात नाही. महाराष्ट्र ज्या प्रमाणात केंद्राकडे कराची रक्कम जमा करतो त्या प्रमाणात केंद्राकडून अर्थसहाय्य मिळत नाही. निधी देण्याची जबाबदारी केंद्राला टाळता येणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

कमलनाथ चमत्कार करू शकतातमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कर्तृत्वाबद्दल मला विश्वास आहे, त्यांची क्षमता मी जाणतो.ते चमत्कार करू शकतात असे लोकांनाही वाटते, असे सांगत शरद पवार यांनी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ बाजू पलटतील असे सूचित केले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता ते म्हणाले, शिंदे यांना काँग्रेस पक्षाने संधी द्यायला हवी होती. तथापि,लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच काही पद देण्याची पद्धत त्या पक्षात नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाला दोष देता येणार नाही. काँग्रेसकडे नेतृत्व आणि कर्तृत्वही आहे आणि त्या पक्षाचे भविष्य ऊज्ज्वल आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा