शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 10:36 AM

Sanjay Raut : "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच राजकारणात आलो," राऊत यांनी उलगडला जीवनप्रवास

ठळक मुद्दे"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच राजकारणात आलो," राऊत यांनी उलगडला जीवनप्रवास

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच काम करायचं आहे हे मनात पक्क होतं, अशी एक आठवण शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपला प्रवास उलगडताना सांगितली. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी "फेस टू फेस" या नव्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेतली. राजकीय व्यक्तींची अराजकीय मुलाखत असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या मुलाखतीदरम्यान राऊत यांनी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाविकास आघाडीची स्थापना यावरही उत्तर दिलं. 

"राज ठाकरे यांनी शिवसेनेची साथ सोडणं आणि राज्यात महाविकास आघाडीची स्थापना होणं हे महाराष्ट्राच्या तसंच शिवसेनेच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना आहेत. राज ठाकरे जेव्हा पक्ष सोडून गेले तेव्हा जवळच्या घडामोडीतला मी एक साक्षीदार आहे. खुप गोष्टी मी पाहिल्या. त्या दिवशी मी त्यांच्या घरी होती. त्या दिवशी त्यांचे लोक माझी गाडी तोडत होते हेदेखील मी पाहिलं. मनोहर जोशीही निघून गेले. मी जर लिहायला गेलो तर खूप मोठे स्फोट होतील," असं संजय राऊत म्हणाले. 

राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले...

"महाविकास आघाडीच्या घटनाक्रमाबद्दल अनेकांनी लिहिलं. पण अनेकांनी लिहिलेल्या घटनाक्रमात काहीच अर्थ नाहीये. अनेकदा लोकं मला राजकारणावर लिहा, सिंहासन २ लिहा असं सांगतात. आपण अनेक गोष्टी पाहिल्यात, आपण का लोकांना अडचणीत आणायचं?," असा सवालही त्यांनी केला. जे तुम्ही वाचता त्यात काही सत्य नाही. पडद्यामागे काही वेगळंच घडलं आहे, आज जे सत्तेत बसलेत त्यांनाही त्या पडद्यामागची पटकथा माहित नसल्याचं राऊत यांनी नमूद केलं.  राजकारणात नसतो तर..."राजकारणात नसतो तर मी पत्रकारचं झालो असतो. पत्रकारीतेलाच मी माझा पेशा म्हणून स्वीकारलं होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ असल्यामुळे राजकारणात आलो. सामना या वृत्तपत्राची दखल ही सर्वत्र घेतली जाते. त्याचा संपादक हा राजकारणीच असतो. संपादकांना एखादी भूमिका असावी, ती नसली तर वृत्तपत्र पुढे नेता येणार नाही. टिळक, आगरकर, अत्रे यांनाही भूमिका होती," असंही राऊत म्हणाले.

"सामना हे माझं खरं घर आहे. माझं अख्ख आयुष्य त्या ठिकाणी काढलं. मी शिवसेना भवनात जातो, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा मी अनेकदा मातोश्रीवर जायचो, देशभरात जातो, अशा अनेक गोष्टी मला आवडतात," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या घरातील एक मजेशीर किस्साही सांगितला. "माझ्या मुलींना वाटतं की मला काही गोष्टींचं ज्ञान नाही. मग त्या मला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. घरी आल्यावर युट्यूब वगैरे अशा काही गोष्टी करतो. त्या मला अनेक गोष्टी या पाहा ते पाहा हे सांगत असतात. सध्याची पीढी ही इतिहासापासून तुटत चाललीये. सध्या जे चाललंय तेच त्यांना इतिहास वाटतो. देश कसा घडला याचा इतिहास त्यांना माहित नाही," असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे