शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही, त्यामुळे स्वबळावर लढावं; काँग्रेस नेत्याची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

By प्रविण मरगळे | Published: December 19, 2020 1:22 PM

आगामी काळात राज्यात महापालिका, जिल्हापातळीवरील निवडणुका येणार आहेत, यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढतं का? हे पाहणं गरजेचे आहे.

ठळक मुद्देमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर लढावं अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कॉमन मिनिमम प्रोग्रोमची आठवण करून दिलीशिवसेना महापालिकेतही दिलेला शब्द पाळत नाही, निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सामावून घेत नाही.

मुंबई – राज्यात सत्तांतर होऊन एक वर्ष उलटले, या एक वर्षात कट्टर विरोधक एकत्र आले अन् मित्र दुरावले अशी राजकीय स्थिती पाहायला मिळाली, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले, त्यानंतर अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा असा सामना रंगलेला दिसून आला, यात महाविकास आघाडीने बाजी मारली तर भाजपाला ६ पैकी अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं.

आगामी काळात राज्यात महापालिका, जिल्हापातळीवरील निवडणुका येणार आहेत, यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढतं का? हे पाहणं गरजेचे आहे. तत्पूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर लढावं अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही, कोणत्याही निर्णयात सामाविष्ट केले जात नाही, एकहाती निर्णय घेतले जातात असा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते रवी राजा यांनी केला आहे. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी रवी राजा म्हणाले की, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कॉमन मिनिमम प्रोग्रोमची आठवण करून दिली, शिवसेना महापालिकेतही दिलेला शब्द पाळत नाही, निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सामावून घेत नाही. त्यामुळे पुढील निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी अशी मागणी आम्ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचं त्यांनी सांगितले.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी दिलेलं पत्र दबावतंत्र नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सोनिया गांधी प्रमुख नेत्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम बनवला गेला त्यातील काही मुद्दे सोनियांनी पत्राद्वारे मांडले, म्हणून याचा अर्थ दबावतंत्राचा भाग आहे असं समजण्याचं कारण नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं.

खासगी कर्मचाऱ्यांना विरोध

कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील बेस्टचं खासगीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका काँग्रेसने आधीच स्पष्ट केली आहे. भाडेतत्त्वावरील बेस्टच्या गाड्यावर खासगी वाहक ठेवण्याचा प्रस्ताव आला, त्याला आमचा विरोध आहे. बेस्टचं खासगीकरण करून संपवण्याचा हा प्रकार आहे असा आरोप काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी केला आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाBJPभाजपा