शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

उद्धव ठाकरेंच्या कारभारावर शरद पवारांची गुगली; महाविकास आघाडीत नेते नाराज असल्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 15:37 IST

आता शरद पवारांनी महाविकास आघाडीचं रिमोट माझ्या हातात नाही, पण काही नेते अस्वस्थ आहेत असं सांगत राजकीय वातावरण पेटवलं आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीचं रिमोट माझ्या हातात नाही, पण काही नेते अस्वस्थ महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी कुठल्याही आघाडीच्या सरकारमध्ये नाराजी आणि अस्वस्थता भाजपाला लोकशाही पचत नाही, दुसऱ्या विचारांचे सरकार नको अशी त्यांची भूमिका

मुंबई – शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राज्याच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार आहे, पण निवडणुका वेगळ्या लढू अशी भूमिका भाजपाकडून जाहीर करण्यात आली, मात्र या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचं चिन्हं दिसत आहेत. सरकार महाविकास आघाडीचं असलं तरी स्टेअरिंग माझ्या हातात आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी स्टेअरिंग पकडलेला फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

यानंतर आता शरद पवारांनी महाविकास आघाडीचं रिमोट माझ्या हातात नाही, पण काही नेते अस्वस्थ आहेत असं सांगत राजकीय वातावरण पेटवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री उद्धव ठाकरेंच्या कारभारावर नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यावर शरद पवारांनी भाष्य केले आहे, ते म्हणाले की, तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या एकांगी कारभारामुळे या परिस्थितीत सर्व चाचपडून पाहिल्यानंतर शिवसेनेकडे नेतृत्व द्यावं यावर एकमत झालं असे त्यांनी सांगितले.

तसेच काही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे, महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी कुठल्याही आघाडीच्या सरकारमध्ये नाराजी आणि अस्वस्थता असते. राज्य चालवताना काही इच्छा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत तर अस्वस्थता वाढते. सध्या नवीन पर्याय नसल्यानं हे सरकार ५ वर्षे चालेल, सध्याची परिस्थिती पाहता कोणालाही निवडणूक नको आहे असंही शरद पवार यांनी सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याची कबुलीच दिली आहे.

त्यासोबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, एका ठिकाणी बसून राज्याचा कारभार पाहत आहेत पण थोडं फिरलंही पाहिजे असं विधान शरद पवारांनी केलं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत या विरोधकांच्या आरोपावर शरद पवारांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच राष्ट्रवादीत अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांना फिल्डवरची जबाबदारी दिली आहे. तर अजितदादांची फिल्डपेक्षा मंत्रालयात अधिक गरज आहे कारण त्यांच्याकडे अर्थ नियोजनाची जबाबदारी आहे. जयंत पाटील आणि अजित पवार पक्षाचं कामही पाहत आहेत असं शरद पवारांनी सांगितले. सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, भाजपाला लोकशाही पचत नाही, दुसऱ्या विचारांचे सरकार नको अशी त्यांची भूमिका आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांना सोबत घेऊन जायचं असते पण त्यांना असं करु देत नाहीत असं सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपाच्या इतर नेत्यांना टोला लगावला. तर राम मंदिराच्या भूमीपूजनाचं निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही, कारण सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचं गांभीर्य आहे, राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपाचं मोठं विधान

शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'त्याने' पहाटे ४ वाजता उठून कार धुण्याचं काम केलं, बारावीत मिळाले ९१ % गुण

सोन्याच्या दराने बनवला नवा रेकॉर्ड तर चांदीही करणार मालामाल; जाणून घ्या आजचे दर

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ यांची उडी; गृहमंत्री अनिल देशमुखांची घेतली भेट

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेस