शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

Maratha Reservation: “देवेंद्र फडणवीसांना कायद्याचे जास्त ज्ञान; त्यांचाही वकिली सल्ला घेऊ”; संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 12:34 IST

Maratha Reservation: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

नवी दिल्ली:मराठा आरक्षण आणि यासंदर्भातील १०२ व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे बोट दाखवले आहे. तर, सरकारला आरक्षण द्यायचेच नाही, असा दावा भाजप करत आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असून, देवेंद्र फडणवीसांना कायद्याचे जास्त ज्ञान; त्यांचाही वकिली सल्ला घेऊ, असा खोचक टोलाही लगावला आहे. (sanjay raut criticizes devendra fadnavis on 102 amendment bill and maratha reservation)

संसदेच्या पावसाळी अधिवेशात १०२ व्या घटनेच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांचा पाठिंबा असल्यामुळे ते संमत होईल, असे सांगितले जात आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आरक्षणाबाबतची अपवादात्मक परिस्थिती आहे. त्याबाबत काय करायचे हे राज्य ठरवेल. त्यात कोणताही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ. केंद्रानेही घ्यावी, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

PM मोदींची UNSC मध्ये पंचसुत्री; रशियाने मानले भारताचे आभार, व्लादिमीर पुतिन म्हणाले...

आम्ही त्यांच्या मतांचा आदर करतो

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यांना कायद्याचे पेच जास्त माहीत आहेत. आम्ही त्यांच्या मतांचा आदर करतो. काही वकिली सल्ला लागला तर सरकार नक्कीच त्यांचा सल्ला घेईल. हा काही राजकीय मानपानाचा विषय नसून एका मोठ्या समाजाला मदत करण्याचा हा विषय आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

नीरव मोदीला दिलासा! लंडन हायकोर्टाने दिला महत्वाचा आदेश; भारत वापसीला ब्रेक लागणार? 

राज्य आरक्षण देऊ शकेल की नाही याची शंका

राज्यांना आरक्षणाचा अधिकार दिला तरी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्याने वाढवता येणार नाही. त्यामुळे राज्यांना अधिकार मिळूनही राज्य आरक्षण देऊ शकेल की नाही याची शंका आहे. तरीही केंद्र सरकारने जे पाऊल टाकले त्याकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो. त्यावर लोकसभेत चर्चा होईल. राज्यसभेतही होईल. आम्ही पूर्णपणे या जनतेच्या हिताच्या बिलाला पाठिंबा देत आहोत, असे संजय राऊत यांनी नमूद केले. 

आता बुलेट ट्रेनने अयोध्येला जाता येणार; दिल्ली-वाराणसी मार्गावर १२ स्थानके निश्चित!

दरम्यान, १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारांना नाहीत, असा चुकीचा अर्थ काढला जात होता. खरे तर केंद्र सरकारची आधीपासूनच ही भूमिका होती. आरक्षण ठरवण्याचा अधिकार राज्यांकडेच आहेत आणि ते केंद्राने स्वतःकडे घेतलेले नाहीत, असे सांगत ठाकरे सरकारला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे नवनवीन गोष्टी आणून वेळकाढूपणा केला जात आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण