शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

“एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन, हे बरोबर आहे का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:01 IST

इंधनदरवाढ, महागाईविरोधात काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन करत आहे.

ठळक मुद्देसंभाजीराजेंची अशोक चव्हाणांवर टीकाआता हे बरोबर आहे का?, संभाजीराजेंची विचारणाइंधनदरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

मुंबई: राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आरक्षणाच्या विषयावरून विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे इंधनदरवाढ, महागाईविरोधात काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला असून, एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन, हे बरोबर आहे का, अशी विचारणा केली आहे. (sambhajiraje criticised ashok chavan over agitation in nanded)

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. त्यात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये पार पडलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावरून आता भाजप खासदार संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. 

“आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारने कृषी विधेयक तातडीने मागे घ्यावं”

हे बरोबर आहे का?

संभाजीराजे यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन…त्यात ते म्हणताय विराट मोर्चा झाला, जोरदार आंदोलन पार पडले अणि त्यात सहभागी झालेल्या जेष्ट नागरिक आणि लहान मुलांचे आभार मानले. आता हे बरोबर आहे का?, अशी विचारणा संभाजीराजे यांनी केली आहे. 

अशोक चव्हाणांची मोदी सरकारवर टीका

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असला, तरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार आहे. युपीए सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तर विरोधी पक्ष म्हणून भाजप मोठ्या प्रमाणात टीका करत होते. त्यांनी त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतही मोठा गोंधळ घातला होता. आता मात्र, पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर गेले आहेत. तर डिझेलचे दरही वाढले आहेत, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात हल्लाबोल केला. 

“मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू; बहुमत आहे, तर घाबरता कशाला?”: देवेंद्र फडणवीस

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मोदी सरकार इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला. 

 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीBJPभाजपाFuel Hikeइंधन दरवाढInflationमहागाईNandedनांदेड